Friday, 29 December 2017

G D P सकल राष्ट्रीय उत्पन्न

#सकल_राष्ट्रीय_उत्पन्न_(G_D_P)

   एखाद्या देशाची विशिष्ट कालावधीतील आर्थिक प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जी डी पी ही संज्ञा जगभरात  वापरली जाते .राज्यकर्ते ,अर्थतज्ञ ,  गुंतवणूकदार , व्यावसाईक , बँकर , राजकारणी याशिवाय माध्यमे यांनाही त्याच्या आकडेवारी , अंदाजात रस असतो . यात त्या देशातील तिमाही /वार्षिक कालावधीतील निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा यांचे बाजारमूल्य मोजले जाते .जगाच्या तुलनेत त्या देशाची प्रगती तसेच इतर देशाच्या तुलनेतील त्या देशाची प्रगती किती आहे हे मोजण्याचा तो एक मानदंड आहे .नुसत्या जी डी पी वरून देशातील लोकांचे रहाणीमान आणि क्रयशक्ती निश्चित अशी समजत नसल्यानेच खर्च करण्याच्या त्यांच्या क्षमतेवरुन काढलेला जी डी पी अधिक अचूक असतो .जी डी पी वरून त्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा अंदाज बांधता येतो .
    जी डी  पी ची व्याख्या करणे सोपे तर मोजमाप करणे ही एक किचकट प्रक्रिया आहे .त्याचप्रमाणे प्रत्येक देशाची जी डी  पी मोजण्याची पद्धत वेगवेगळी आहे . साधारणपणे सर्व एकत्रित उत्पन्न किंवा सर्वांनी केलेला खर्च यांची बेरीज साधारण जवळपास सारखी असल्याने तो उत्पनावरून आणि खर्चावरून या दोन प्रकारे काढता येते . उत्पन्नावरून  काढलेल्या जी डी  पी चा काही लोक जी डी पी (आई) असा उल्लेख करतात .यात सर्वांना मिळणारे वेतन , सर्व नोंदीत आणि अनोंदित फर्मचा करपूर्व नफा याची बेरीज करुन त्याना मिळालेली सरकारी मदत वजा करुन काढतात .तर खर्चावरून जी डी पी काढणे अधिक शास्त्रशुद्ध असून त्यामध्ये सर्वानी केलेला खर्च , गुंतवणूक , सरकारचा खर्च आणि केलेली आयात व निर्यात यांतील फरक यांची बेरीज करुन काढली जातो .
 जी डी पी हा आर्थिक प्रगतीचा मापदंड असल्याने त्याच्या आकडेवारीचा अर्थव्यवस्थेतील सर्व गोष्टींवर परिणाम होतो .जर जी डी पी दर चांगला असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा होतो की देशात बेकरी कमी आहे .कामगारांचे वेतनमान उच्च आहे .औद्योगिक क्षेत्रात मजुरांना मागणी आहे .उत्पादीत मालाला उठाव आहे .जी डी पी तील बदलांचा मग तो कमी होवो अथवा जास्त स्टॉक मार्केटवर ताबडतोब परिणाम होतो .अर्थव्यवस्था खराब असणे म्हणजे कंपन्यांची नफाक्षमता कमी असणे ज्यामूळे शेअरचे भाव खाली येतील त्यामुळे गुंतवणूकदार चिंतित असतील तर अर्थतज्ञ  अर्थव्यवस्था मंदीत असल्याचे भाकीत  करतील .
 भारतात जी डी पी मोजण्याचे कार्य केंद्रीय सांख्यकी विभाग (C S O) यांच्याकडून केले जाते .ते दोन्ही प्रकाराने (उत्पादन आणि खर्च) त्याची मोजणी करुन निव्वळ  व खरीखूरी (gross and inflection adjusted)  आकडेवारी प्रसारित करतात .या दोन्ही मध्ये आठ उपविभाग असून त्यामुळे कोणत्या गोष्टींवर अधिक लक्ष दिले पाहिजे ते चांगल्या प्रकारे अधोरेखित होते . यासाठी आवश्यक माहिती गोळा करणे , तिचे विश्लेषण करणे आणि त्याची नोंद ठेवून जतन करणे हे या विभागाचे काम आहे .विविध प्रकारचे सर्व्हे करुन तसेच विविध केंद्र व राज्य सरकारी विभागात समन्वय साधून माहितीचे संकलक केले जाते ,  जसे शेतीचे उत्पन्न , घावूक बाजार निर्देशांक ,  औद्योगिक उत्पादन निर्देशांक , महागाई निर्देशांक इ .या सर्व माहितीचे पृथकरण करुन जी डी  पी  काढला जातो . याची आकडेवारी  तिमाही / वर्ष संपल्यावर दोन महिन्यांनी जाहीर केली जाते तसेच वेळोवेळी माहितीत जी भर पडते त्याप्रमाणे दुरुस्त केली जाते . पुढील तिमाही /वर्ष याबाबतीतील अंदाजही वर्तवला  जातो .त्याच्याशी संबंधित घटक त्यांच्या जरूरीप्रमाणे या माहितीचा उपयोग करुन घेतात .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 22 December 2017

शेअरबाजार आक्षेप गैरसमज

#शेअरबाजार_आक्षेप_गैरसमज

   शेअरबाजाराविषयी अनेक आक्षेप आणि गैरसमज आहेत .त्यातील महत्वाचे आक्षेप , गैरसमज असे -
१.शेअर बाजार हा जुगार आहे : अनेक लोकांचा  शेअर बाजार हा जुगार आहे असा समज आहे .हे लोक जेथे आपली बचत आणि गुंतवणूक करतात त्या संस्था मोठया प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक करीत असतात .शेअरबाजारात तुम्ही कोणत्या शेअरची खरेदी/विक्री  कधी आणि कोणत्या भावाने करता यावर तुम्हाला होणारा फायदा / तोटा अवलंबून असतो .अनेक लोक आजही ज्या पद्धतीने अभ्यास न करता गुंतवणूक करतात त्यामुळे या गैरसमजाला पुष्टी मिळते .यांमधील अल्प अथवा दीर्घकालीन गुंतवणूक ही , लाभ मिळवावा या आणि याच हेतूने केली जावी .यातील लाभाचे लोभात रूपांतर झाले की व्यक्ती सारासार विचार गमावून बसते .लाभ आणि लोभ यातील सीमारेषा अत्यंत पुसट आहे .यात होणाऱ्या फायद्यामुळे अधिकाधिक फायदा मिळवावा असा मोह होवू शकतो .मांत्र,  केवळ आंधळेपणाने गुंतवणूक करुन क्वचित फायदा होत असेल , परंतू कायम फायदा होवू शकत नाही .अशा व्यक्तींना एक जोरदार फटका बसला की त्या बाजारपासून दूर होतात आणि भरकटल्यासारखी बाजाराबद्दल काही ठाम विधाने करत असतात .येथे अभ्यास करण्याची तयारी आणि थांबण्याची चिकाटी असेल तर निश्चित फायदाच होतो .तेव्हां गुंतवणूक करण्यासाठी पैसे आणि मनोबल असेल तर आकर्षक परतावा मिळू शकतो .
२.भांडवलदार आणि असामाजिक घटकांना यामुळे प्रोत्साहन मिळते : कोणतीही व्यवस्था असेल तर तिचा गैरफायदा घेणारे असतातच म्हणून व्यवस्थाच मोडीत काढायची नसते .आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि त्यात भांडवलनिर्मिती करण्याची परवानगी आहे . बाजारातील कोणाताही  घटक बाजाराला सातत्याने एक दिशा दाखवू शकत नाही .आर्थिक क्षेत्र आता बऱ्यापैकी नियमित झाल्यामुळे त्यावर बाजार नियंत्रकांचे (market regulator) नियंत्रण असते . त्यामुळे सर्व व्यवहारात पुरेशी पारदर्शकता आली आहे .एकाद्या शेअरचे गुणात्मक आणि संस्थात्मक मूल्य शोधून योग्य किमतीस गुंतवणूक करू शकतो आणि फायदा मिळवू शकतो .
३.शेअरच्या वाढलेल्या भावाचा कंपनीस काही फायदा नसतो : हा आक्षेप अर्धसत्य आहे .यातून सटोडीयांचा फायदा होत असला तरी शेअरचे भाव वाढले असतील तर कंपनीस अधिमूल्याने भांडवल किंवा कमी व्याजदराने कर्ज उभे करता येवू शकते .गुंतवणूकदारांना विक्री करुन किंवा नवी खरेदी /विक्री करुन गुंतवणूक काढून घेण्याचा लाभ मिळवण्याचा पर्याय मिळतो .सरकारला कर मिळतो यात कोणतेही लपवाछपवीचे व्यवहार होत नसल्याने काळया पैशांची निर्मिती होत नाही .
४. या व्यवहारात एकाचा फायदा हा दुसऱ्याचा तोटा असतो त्यामुळे त्याचा तळतळाट लागतो : शेअर बाजारातच नव्हे तर कोणाताही व्यवहार हा तारतम्याने करायचा असतो .प्रत्येकाने अतीलोभ आणि भय ह्यांवर ताबा ठेवून आणि दूरवरचा विचार करून तो करावा लागतो .यामधे जोखीम आहेच आणि जोपर्यंत विशिष्ट किंमतीत असा कोणताही व्यवहार करण्याची सक्ती होत नाही तोपर्यत ते आपल्या मर्जीने झाले आहेत आणि करणाऱ्याने ते जाणीवपूर्वक केले आहेत असे  समजावे लागेल .
५. हे श्रीमंतांचे काम आहे आपले काम नाही : खरं तर महागाईवर मात करणारा परतावा (return) मिळण्यासाठी प्रत्येकाने बाजारांत गुंतवणूक करायला हवी .गुंतवणूकदाराची गरज भागवणारे , जास्त उतारा देणारे त्याचप्रमाणे तरलता (liquidity) असलेले हे साधन आहे .ते जोखमीसह स्वीकारावे लागते . भविष्यातील वाढत्या गरजा कदाचीत ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते भागवू शकतील परंतू ज्याची खरीखुरी गरज आहे अशा व्यक्ती यापासुन वंचित राहतील .मुळात येथे गुंतवणुकीची सुरुवात ही अत्यल्प पैशाने करता येते .थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणे गुंतवणूक करुन त्यात वाढ करता येवू शकते .
६.या नादाला लागून कर्ज झाले ,घरदार विकावे लागले : गुंतवणूकदारांचे पाय खेचणारा हा एक फिल्मी विचार आहे .स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचे नाही .आपली जोखीम घेण्याची कुवत आणि उपलब्ध पैसे याचा योग्य वापर करुन यातून संपत्ती निर्माण करता येते .
७.ही हरामाची कमाई आहे : हा एक अनेकांचा आवडता भडक आक्षेप आहे .यात कष्ट करावे लागत नाहीत घाम गाळावा लागत नाही .असे असेल तर सर्व बौद्धिक  कामे करुन मिळवलेली कमाई ही हरामाची समजावी लागेल .बँकेत पैसे ठेवून व्याज मिळवणे , कमिशन घेवून विक्री व्यवहार करणे , अल्प भावात फ्लॅट घेवून तो भाड्याने देणे कालांतराने जास्त किंमतीस  विकणे ही जर हरामाची कमाई नसेल तर पुढे भाव वाढतील या हेतूने घेतलेले शेअर हरामाचे कसे?
   तेव्हां आपण आपल्या आणि इतरांच्या गुंतवणूकीकडे नैतिक अनैतिकतेच्या  कालबाह्य कल्पना झुगारून निर्मळतेने पाहू शकू तोच खरा सुदिन !

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
              #कॉफी_कॅन_पोर्टफोलिओ
   भांडवलबाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांचे त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या पध्दतीवरून पडणारे पाच प्रमुख प्रकार आपण या पूर्वीच्या पाहिले आहेत . यातील दीर्घ मुदतीने गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या प्रकाराच्या गुंतवणूकीशी मिळतेजुळते कॉफी कॅन पोर्टफोलिओ हे एक तंत्र आहे .
   1984 साली रॉबर्ट किर्बी  या पोर्टफोलिओ मॅनेजरने  गुंतवणूकीच्या या पध्दतीला हे नाव सूचवले .19 व्या शतकाच्या सुरुवातीला ओल्ड वेस्ट या भागातील लोक आपल्याकडील मौल्यवान गोष्टी जसे पैसे ,  सोन्याचे दागिने या सारख्या गोष्टी कॉफीचे टीन मधे ठेवून गादीत दडवून ठेवत असत .10/15 वर्षांनी अगदीच गरज पडली तरच त्याचा उपयोग करत . रॉबर्ट किर्बी याने याच तंत्राचा वापर करून असे सुचवले की काही चांगले शेअर्स शोधून ,एक डायव्हर्सीफाईड पोर्टफोलिओ तयार करावा . त्यातील भावामधे होणारी चढ उतार याकडे  लक्ष देवू नये .त्याचे पुनर्मुल्यांकन करु नये आणि ते किमान दहा वर्ष तरी विकले नाहीत तर त्यात खूप मोठी मूल्यवृद्धी होवू शकते . अनेक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकीसाठी ही पद्धत सध्या वापरत आहेत .
   या तंत्राने गुंतवणूक करण्याचे प्रमुख फायदे असे -
१. ही एक दीर्घ काळासाठीची गुंतवणूक प्रक्रिया असल्याने एखाद्या तिमाहीत अपेक्षित नसलेली कामगिरी , सरकारी धोरणातील बदल या सर्वांचा गुंतवणूकदारावर परिणाम होत नाही .सी सी पी (coffee can portfolio) तंत्राने गुंतवणूक करणाऱ्यावर अशा अल्पकालीन बदलामुळे बाजारभावातील फरकामुळे आपल्या उद्देशापासून फारकत घेतली जात नाही .
२. या पद्धातीत इंडेक्सच्या परताव्याहून अधिक परतावा मिळण्याची जास्त शक्यता : इंडेक्सने दीर्घकाळात चांगला परतावा दिल्याने त्यामधे अथवा त्याच प्रमाणात शेअरमध्ये  गुंतवणूक करणे हा एक फायदेशिर सौदा ठरू शकतो .परंतू इंडेक्स एक अनेक शेअरचे मिश्रण असून त्यातील सर्वच शेअर एकाच वेळी वाढ दर्शवित नाहीत .त्यामूळे त्यात होणारी वाढ ही त्यातील सर्व शेअरची सरासरी असते . कॉफी कॅन पोर्टफोलिओ मध्ये भविष्यात फक्त वाढच अपेक्षित असलेल्याच शेअरचा सामावेश असलेले शेअर असल्याने यात इंडेक्सहून अधिक परतावा मिळू शकतो .
३.कमीत कमी आस्थापन खर्च : यामधे शेअरची सातत्याने खरेदी / विक्री होत नसल्याने एकंदर उलाढालीचे प्रमाण खूप कमी असते , त्यामुळे यावर होणारा ब्रोकरेज आणि इतर खर्च बऱ्याच प्रमाणात वाचतो .
  या पद्धतीने आपला गुंतवणूक संच (portfolio) बनवणाऱ्या व्यक्ति आणि संस्था शेअरची निवड करताना खालील गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतात .
१.गुंतवणूकीचे विविध निकष वापरून शोधलेली अशीच कंपनी असेल की जीने कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारक यांच्या मालमत्तेत गेल्या दहा वर्षात कित्येक पटीने वाढ केली आहे .दरवर्षी उलाढाल किमान 10% वाढली आहे .
२.यात गुंतवलेल्या भागभांडवलावर मागील दहा वर्षी प्रत्येक वर्षी किमान 15 % चक्रवाढव्याजदराने उतारा मिळवला आहे .(Return on capital employed) ज्या कंपन्याचा 5हून अधिक आणि 10 वर्षाचा फायनांशियल डाटा उपलब्ध आहे तो विचारात घेतला जातो .5 किंवा त्यापेक्षा कमी वर्षांची माहिती असलेल्या कंपन्याचा अजिबात विचार केला जात नाही .
   बाजारात आपल्याला शेअरचा भाव (Price ) समजतो पण त्याचे आंतरिक मूल्य (हे शोधून काढायचे असते .वॉरेन बफे यांच्या ' चांगले शेअर घ्यावे आणि विसरुन जावे '  याच साध्या तंत्राची ही सुधारीत आवृत्ती असून अनेक गुंतवणूकदार , गुंतवणूक तज्ञ , ब्रोकर , गुंतवणूक संस्था या पद्धतीचा वापर करीत असून ते त्यांनी शोधलेले शेअर्स जाहीरही करीत आहेत .एक मार्गदर्शक दिशा म्हणून याचा अभ्यास करून आपलाही एक चांगला कॉफी कॅन पोर्टफोलिओ बनवून अधिक लाभ मिळवू शकतो .सी सी पी तंत्राचे प्रमुख निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्याची नावे खालील चित्रात दिली आहेत ती अभ्यासासाठी असून त्यांची शिफारस केलेली नाही . आपल्या गुंतवणूक  सल्लागाराकडून सल्ला आणि जोखिम समजून घेवून गुंतवणूक निर्णय घ्यावा .अशाच प्रकारचे निकष वापरून चांगली कामगिरी अपेक्षित असलेले शेअर्स , इक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजना ,इंडेक्स फंड शोधता येवू शकतील .

©उदय पिंगळे



Friday, 8 December 2017

आर्थिकबाबींतील या चूका टाळा ....

                            आर्थिकबाबींतील या चूका टाळा .....
    मी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात     ' शेखचेल्ली ' चा धडा होता .तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता .पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही .तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत . आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो .
१ बचत आणि गुंतवणूक :अनेकजण या दोन्हीची गल्लत करून आपण केलेल्या बचतीलाच गुंतवणुक असे समजतात .या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून गुंतवणुकीत जाणीवपूर्वक धोका (Calculated Risk) स्वीकारावा लागतो .याच लेखात दिलेल्या पेज /ब्लॉग  चे लिंकवर जावून मी पोस्ट केलेला ' बचत आणि गुंतवणूक'  यावरील लेख वाचावा .
२ इन्शुरेन्स ही गुंतवणूक नाही :इन्शुरेन्स आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत .इन्शुरेन्स मधून कठीण प्रसंगी सुरक्षिततेची तरतूद पर्याय म्हणून पैशांच्या स्वरूपात करायची असते तर गुंतवणुकीतून  महागाईवर मात करणारा आकर्षक परतावा मिळवायचा असतो .या दोन्हीही गोष्टी एकदम पूर्ण होवू शकत नाहीत .तेव्हा वेगळे असे सुरक्षा कवच घेवून अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा . दोन्हीही गोष्टी एकत्रित असणाऱ्या योजनातून आपली पूर्ण गरज भागू शकत नसल्याने अशा योजना घेवू नयेत .
३ बचत आणि गुंतवणूक करण्यात उशीर करणे : अनेकजण खर्च करायला एका पायावर तयार असतात मांत्र गुंतवणूक करण्यासाठी ते टाळाटाळ करतात .गुंतवणूकीची सुरूवात लवकरात लवकर करणे केव्हाही चांगलेच .त्यामुळे आपली गुंतवणूक चक्राकारगतीने वाढते .गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावून घेता येतात .उशीरा सुरूवात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागल्याने फारसे पर्याय आजमावता येत नाहीत .
४ कर्ज घेवून चैन करणे : सहज उपलब्ध होणारे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांमुळे अनावश्यक गोष्टी या आपल्या गरजा कधी बनतात ते समजत नाही .इतर कोणत्याही मार्गाने उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा यावरील व्याजदर सर्वाधिक असतो त्यामुळे आपण कर्जाच्या सापळ्यात कधी अडकतो  ते समजत नाही .
५ कर्ज फेडण्याऐवजी गुंतवणूक करणे : एकाचवेळी कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे .आपल्याकडे अतिरिक्त रक्कम आली तर कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे यातील पर्यायांचा बारकाईने विचार करावा लागतो . दीर्घ मुदतीच्या कर्जाची अंशतः परतफेड करणे भवितव्याच्या दृष्टीने अनेकदा खूप फायद्याचे ठरते .
६ महत्वपूर्ण माहितीकडे कानाडोळा करणे : अनेकदा  गुंतवणूक करताना आणि कर्ज घेतांना एक करार केला जातो .यात सर्व अटी आणि जोखिम याची माहिती असते .या अटी काय आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होवू शकतो याची जाणीव आपल्याला असणे जरूरी आहे .यामुळे स्वतंत्र  निर्णय घेता येणे सोपे जाते .केवळ एजंट सांगतो त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये .
७ गुंतवणूक व कर्ज यांचे कागदपत्र नीट न पहाणे आणि  ठेवणे : आपण केलेली गुंतवणूक आणि  घेतलेली कर्ज या संबंधी सर्व कागदपत्र तपासून घेणे महत्वाचे आहे .आपण मान्य केलेल्या अटीप्रमाणे ते आहे की नाही हे पहावे आणि त्याप्रमाणे नसल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावे .ही सर्व कागदपत्र व्यवस्थित नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत . गुंतवणूकीवरील वारसनोंदी बरोबर आहेत का हे कटाक्षाने पहावे .
८ अंदाजपत्र बिघडणे : आपल्या कुवतीपेक्षा खर्च जास्त होवू नये याची काळजी घ्यावी . ' अंथरुण पाहून पाय पसरावे ' असे म्हटले जाते अगदी तसेच नाही तरी अंथरुण पुरत नसेल तर ते मोठे कसे करता येईल त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे .ज्यायोगे आपल्या अल्प आणि दीर्घकालीन गरजांची पूर्तता आपल्या उत्पन्नातून करता येणे गरजेचे आहे .
   या सर्व गोष्टी आपल्याला माहीत नाहीत असे नाही तरीही आपले पाऊल डगमगू शकते म्हणून परत  एकदा ही उजळणी .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 1 December 2017

संभाव्य आर्थिक संकटे

#संभाव्य_आर्थिक_संकटे

   अचानक येतात ती संकटे , त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते .संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण या साठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात .व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स , आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे .काही सरकारी आणि खाजगी उपक्रमानी यांसंबंधी विचार करून त्यांच्या कर्मचाऱ्याना काही विशेष सोई उपलब्ध करूनf दिल्या आहेत .काही ठिकाणी या संबंधी सक्ती असून काही ठिकाणी या सोई घेणे न घेणे ऐच्छिक आहे . काही ठिकाणी अशा योजनांचा खर्च व्यवस्थापन करते तर काही ठिकाणी या सेवासाठी पूर्ण अथवा अल्प रक्कम कर्मचाऱ्यास खर्च करावी लागते .
    आपली आर्थिक घडी बिघडवून टाकणारी काही संभाव्य संकटे अशी --
१  नोकरी सुटणे / धंद्यातील नुकसान : सध्या सरकारी नोकऱ्या सोडल्यास शाश्वत अशा कोणत्याच नोकऱ्या नाहीत .काही कारणाने नोकरी सुटल्यास किंवा धंद्यामधे मंदी आल्यास अल्पकाळासाठी येणारे  पैसे बंद होतात .असे असले तरी काही किमान खर्च जसे लाईट बिल , शैक्षणिक खर्च , किराणा माल , कर्जाचे हप्ते यांची व्यवस्था करावी लागते .या संबधित आपल्या किमान गरजा यांचा अंदाज घेवून 3 ते 6 महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम अतिरिक्त व्याजाचा मोह न बाळगता एफ डी किंवा मनी मार्केट फंडात असायला हवा जेणेकरून अल्पकाळात हे पैसे उपयोगी येतील .हे पैसे फक्त याच कारणासाठी वापरले जातील या साठी कायम वेगळे ठेवावेत .
२  नैसर्गिक आपत्ती /युद्ध , दंगल , जाळपोळ याने होवू शकणारे नुकसान :या मुळे अचानक मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते .या पासून काही प्रमाणात संरक्षण होण्यासाठी किमान प्रिमियममधे थर्ड पार्टी इन्शुरेन्स उपलब्ध आहे .
३ जोदीदाराचा मृत्यू : जोडीदाराचा त्यातही कमावत्या व्यक्तीचा मृत्यू हा त्या कुटुंबावर मोठा आघात असतो याची भरपाई कितीही पैशानी होवू शकत नाही आणि पैशावाचून प्रत्येक ठिकाणी अडचणी येतात .हे कटू असेल तरी सत्य असल्याने आपली दीर्घकालीन गरज ओळखून उत्पन्नच्या 20 पट रकमेचा टर्म इन्शुरेन्स काढणे आणि तो वेळोवेळी वाढणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे .
४ आजारपण / गंभीर आजार : घरातील व्यक्तीचे आजारपण किंवा असाध्य आजार याच्या उपचारांसाठी आपली सर्व पूंजी संपू शकते .किमान 5 लाख रु आरोग्यविमा असावा आणि तो वेळोवेळी वाढावावा .असाध्य रोगांच्यासाठी उपलब्ध विशेष पॉलिसी ज्यांना शक्य असेल त्यांनी घ्यावी .
५ शैक्षणिक खर्च :शैक्षणिक खर्चात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे .एकेकाळी ज्या खर्चात उच्चशिक्षण पूर्ण होत होते त्याहून जास्त पैसे मुलांना प्राथमिक शिक्षण घेण्यास लागतात .वाढत्या शैक्षणिक खर्चासाठी लवलरात लवकरात लवलर ईक्विटी म्यूचुअल फंडाच्या योजनेत एस आई पी  चालू करावे .
६ निवृत्तीनंतरची तरतूद : वाढती आयुर्मर्यादा आणि महागाई यासाठी निवृत्तीनंतरची 25 वर्ष विचारात घेवून ईक्विटी म्यूचुअल योजनेत दीर्घकाळाचे एस आई पी  चालू करावे .
७ मित्र / नातेवाईकांना मदत : आपल्या अडीअडचणीस आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा आपण मित्र व नातेवाईक यांच्याकडून बाळगत असतो तशीच अपेक्षा तेही आपल्याकडून करीत असणारच .आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपण कोणाला फारशी मदत करु शकत नाही तसेच काहींना टाळूही शकत नाही .यासाठी वेळीच काहीतरी किमान तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे .
    ही यादी परिपूर्ण नाही तरीही सहज लक्षात आलेल्या या गोष्टी विचारात ठेवून त्या अनुषंगाने तरतूद करण्याचा प्रयत्न केल्यास अशी संकटे आलीच तर त्याची अंशतः आर्थिक भरपाई होवू शकते आणि आपला अर्थप्रवाह स्थिर राहण्यास मदत होते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

Friday, 24 November 2017

' भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मूडीजकडून वाढ '

' भारताच्या आंतरराष्ट्रीय मानांकनात मुडीजकडून वाढ '
  मूडीज ही आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था (Rating agency)असून 1909 पासून ती विविध देशांना ग्रेड  देते .या ग्रेड Aaa , Aa , A , Baa , Ba , B , Caa , Ca आणि C या नऊ विभाग असून 1,2,3 असे उपविभाग आहेत .ते उतरत्या क्रमाने आहेत .दिलेल्या कर्जाची परतफेड न केल्यास कीती प्रमाणात जोखिम आहे ते या ग्रेड ने दाखवले जाते .Aaa ही सर्वात सुरक्षित ग्रेड असून C ही सर्वात धोकादायक ग्रेड आहे .अशा प्रकारे ग्रेड दिल्यावर बाजारात त्यादेशाची प्रतिमा एक निर्माण होते  .या संस्थेचे संस्थापक जॉन मूडी यांनी मूडी कोर्पोरेशनची  मूडीज इन्वेस्टर्स ही  कंपनी असून ती क्रेडिट रेटिंग आणि आर्थिक बाबतीत संशोधन करते .
   रेटिंग ठरवताना देशावरील कर्ज व ते फेडण्याची क्षमता यांचा विचार केला जातो .याची निश्चित अशी पद्धती नसून ही एजंसी 100 हून अधिक अर्थशास्त्रज्ञ आणि विश्लेषक यांच्याशी विचारविनिमय करून त्या देशाचे रेटिंग ठरवते .या वरून त्या देशातील अर्थव्यवस्था कशी आहे .आखलेली धोरणे परकीय गुंतवणुकदाराना अनुकूल आहेत की नाहीत , आयात निर्यात यांचे प्रमाण , राजकीय स्थिती यांचा अंदाज बांधण्यास मदत होते .अशा प्रकारे मूल्यांकन करणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे .Dun and bandstreet या कंपनीने moodys चा ताबा 1962 ला मिळवून या कंपनीच्या शेअर्सची  न्यूयार्क शेअर  बाजारात 2000 साली मूडीज कॉरपोरेशन या पूर्विच्याच नावाने सार्वजनिक कंपनी म्हणून भागविक्री केली .2007 साली मूडीज इन्वेस्टर्स सर्विस आणि मूडीज अॅनालेटिकल सर्व्हिस अशा दोन कंपन्यांत व्यवसाय विभागणी झाली .यातील रेटिंग व्यवसाय मूडीज इन्वेस्टर्सकडे आणि इतर व्यवसाय मूडीज अॅनालेटिकल सर्व्हिसेस कडे विभागला गेला . जागतिक बॉन्ड व्यवसाय हा  मूडीज , फिच आणि स्टँडर्ड अँन्ड पुअर  या तीन मोठ्या रेटिंग एजन्सीकडे एकवटला असून त्यांच्या रेटिंगचा परकीय गुंतवणूकदार गुंतवणूक करताना विचार करतात .
   मुडीजने 14 वर्षाचे नंतर भारतीय बॉन्डचे रेटिंग Baa3 होते ते Baa2 वर आणले आहे .याचा अर्थ सुधारणा झाली आहे .या मधून आपली गुंतवणूक कीती सुरक्षित आहे याचा अंदाज बांधता येतो .सर्व प्रकारची सरकारी कर्जे , म्युनसीपल बॉन्ड , कॉरपोरेट बॉन्ड , मनी मार्केट फंड , बँका , नॉन बँकिंग कंपन्या , दीर्घ मुदतीची कर्जे या सर्वांचा विचार केला जातो .या तिन्ही मान्यवर संस्थांची रेटिंग देण्याची पध्दत निरनिराळी आहे .यांपैकी मूडीज आपले शोध निबंध (research reports) , वेळोवेळी एखाद्या देशाविषयी प्रदर्शित केलेले मत , बाजारात नविन कर्ज घेवून येणाऱ्याना मार्गदर्शन अशा विविध मार्गाने गुंतवणूकदाराना मोलाचा सल्ला देत आहे .
   मानांकनात Baa3 वरून Baa2 अशी सुधारणा झाली याचा अर्थ यापूर्वी ज्या आर्थिक सुधारणा आपण अमलात आणल्या त्या योग्य असून त्याचे  सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत .यामधे नोटाबंदी , जी एस टी ची अमलबजावणी ,स्टेट बँक सहयोगी बँकांचे विलिनीकरण , रेरा कायदा , भ्रष्टाचार विरोधी कायदा , यू आई  एन  , यू डी ए वाई पॉवर बॉन्ड या गोष्टीचा विचार केला असावा .जागतिक बँकेने या सुधारणांची प्रसंशा केली आहे आणि व्यवहारास योग्य देशांच्या यादीतील भारताचे स्थान 130 वरून 100 व्या क्रमांकावर आणले आहे . आयात निर्यात यातील फरक (balance of payments) आणि चालू खात्यावरिल तूट (fiscal deficits) या गोष्टी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि जागतिक बँक यांच्या  दृष्टीने चिंतेची बाब राहिली असली तरी ती एका विशिष्ठ मर्यादेत राहील यासाठी सरकारचा प्रयत्न आहे .वित्तीय तूट 3% या मर्यादेत ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे . रेटिंग वरील आक्षेपाबाबत मूडीजने तपशीलवार खुलासा करणारे (FAQ) पत्रक प्रसिद्ध केले असून 2017/18 च्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात 7.5% राहील असा अंदाज व्यक्त केला आहे . यांमुळे परकीय गुंतवणूकदार पेन्शन फंड याची भारतीय बाजारातील गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून भांडवलबाजारावर याचा सकारात्मक परिणाम दिसत असून बाजार रोज नविन  उच्चांक करीत आहे .

©उदय पिंगळे

Friday, 17 November 2017

कंपन्यांचे वर्गिकरण ...

                                         कंपन्यांचे वर्गिकरण

   शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या कंपन्याचे बाजारमूल्य (Market Capital) आणि त्यातील शेअर्सची दैनंदिन उलाढाल (Daily Trading Volume) यावरून सध्या कंपन्यांची विभागणी तीन प्रमुख गटात करण्यात आली आहे .१.मोठ्या कंपन्या (Largecap) २.मध्यम कंपन्या (Midcap)आणि ३.लहान कंपन्या (Small can).स्टॉक एक्सचेंजची गव्हर्नीग कमिटी ठराविक कालावधी नंतर प्रत्येक कंपनीचे सरासरी बाजारमूल्य आणि सरासरी दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून वरीलपैकी कोणत्या गटात कोणती कंपनी असावी या संबंधात निर्णय घेत असते . अलीकडे या पद्धतीत सेबीने बदल सुचवला असून तो पुढील वर्षात अमलात येईल .त्यानुसार आता बाजारमूल्यानूसार पहिल्या 100 कंपन्या या मोठ्या 101 ते 250 पर्यंत मध्यम आणि बाकी सर्व लहान कंपन्या  समजण्यात येतील .असे करीत असताना कंपन्यांची दैनंदिन उलाढाल विचारात घेतली जाणार नाही .
    मोठ्या कंपन्यामधे केलेली गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असल्याने सर्व गुंतवणूकदारांची पहिली पसंती त्यांना असते .या कंपन्या सुरक्षित असून यांचे भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढत नाही किंवा कमी होत नाहीत . कंपनीची उलाढाल , नफा , डीवीडेंड , बोनस यावरून त्यात फरक पडतो . साधारण 20% वेगाने त्या वाढत असतात अथवा कमीही  होतात .मांत्र मोठ्या प्रमाणात  अशा कंपनीत गुंतवणूक केली म्हणजे 100%  सुरक्षित झाली असे समजू नये  .
    या कंपन्यांच्या तुलनेत मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरचे बाजार भावात लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत भावातील फरकात कमी अधिक असा  लक्षणीय फरक पडत असल्याने मोठया प्रमाणात अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात .या कंपन्यांचे भाव तेजी असल्यास हळु हळु वाढातात तर मंदी आल्यास झटकन कमी होवू शकतात . त्याचप्रमाणे बिजनेस मॉडेल बदलणे ,व्यवस्थापन मंडळ बदलणे , नादारी ई अनेक कारणांनी त्यात फरक पडून भाव मोठ्या प्रमाणात कमी जास्त होवू शकतात .आज ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या याआधी मिड कॅप /स्मॉल कॅप होत्या .त्यामूळे आपण कोणत्या प्रकारचे  गुंतवणूकदार असून कीती जोखिम स्वीकारू शकतो  त्याचा , आपला बाजारविषयक अंदाज कीती प्रमाणात अचूक घेवू शकतो याचा विचार करून मगच यामधे  गुंतवणूक करावी . सर्व गुंतवणूक एकाच प्रकारच्या कंपन्यांच्यामधे न करता ती विविध ठिकाणी  विभागून करावी .जर आपण जास्त जोखिम घेवु शकत असलो तर मिडकॅप / स्मॉलकॅप कंपन्यांतील गुंतवणुक वाढवावी.बरेच वर्ष पूर्ण बहुमतातील सरकार नसल्याने 2014 मधील सार्वजनिक निवडणुकानंतर स्थिर सरकार आल्याने झालेल्या सकारात्मक भावनेने मिड कॅप /स्मॉल कॅपचे भावात अल्प कालावधीत 2/3 पट वाढ झाली .त्यानी चार महिन्यांचे कालावधीत 100 ते 300% हून अधिक रिटर्न दिला .तेव्हा अशा वेळी आलेल्या संधीचा लाभ करून घेण्याची वेळ साधणे हे ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे .
    याशिवाय मुंबई शेअरबाजाराने बाजारमूल्य व दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून तेथे नोंदवण्यात आलेल्या कंपन्याची 'A ' , ' B ' आणि ' Z ' या तीन गटात विभागणी केली आहे .पहिल्या दोनशे कंपन्या  ' A ' या गटात असून , बाजाराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्या ' Z ' गटात टाकल्या आहेत . उर्वरित सर्व कंपन्या ' B ' गटात आहेत . गुंतवणूक या दृष्टीने 'Z ' गटातील कंपन्यांचा अजिबात विचार करु नये .
   मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी ' T ' या नावाचा एक गट बनवला असून यामधील व्यवहार हे डिलिव्हरी घेवूनच करावे लागतात .त्याचे शॉर्ट सेलिंग करता येत नाही .खरेदी केलेले शेअर  आपल्या डी मॅट खात्यात आल्याशिवाय विकता येत नाहीत .' Z '  गटातील कंपन्यांचे व्यवहार सक्तीने ट्रेड टू ट्रेड पद्धतीनेच होतात .याशिवाय BSC , NSC आणि सेबी आपापसात चर्चा करून कोणत्याही कंपनीचा सामावेश या गटात करु शकतात अथवा या गटातून बाहेर आणू शकतात . या गटात असलेली कंपनी मग ती यापूर्वी कोणत्याही गटात असली तरी त्याचे व्यवहार हे ट्रेड टू ट्रेड या पद्धतीनेच करावे लागतात . सामान्य गुंतवणूकदाराच्या सुरक्षिततेसाठी ही योजना करण्यात आली आहे .

©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 10 November 2017

ब्रोकरची निवड करतांना ......

                            ब्रोकरची निवड करतांना .....
  बाजारात समभाग , कर्जरोखे , ई टी एफ , वस्तुबाजारातिल वस्तु यांची सुलभ खरेदी विक्री करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थाची जरूरी असते .यामुळे व्यवहार  जलद होण्यास मदत होते . या शिवाय या व्यवहारांची हमी बाजार घेत  असल्याने असे व्यवहार सुरळीतपणे पार पडतील याची जाणीव असल्याने खरेदीदार आणि विक्रेते हे दोघेही निश्चिंत रहातात . काही मोजके व्यवहार वगळता बाजारात दलालाशिवाय  असे व्यवहार करणे हे बेकायदेशीर आहे .
  हे सर्व व्यवहार ऑनलाइन होत असल्याने ते पुरेसे पारदर्शक आहेत .सध्या ब्रोकिंग व्यवसायात वैयक्तिक  ब्रोकरशिवाय बँका , नॉन बँकिंग कंपन्या असून त्यांच्यात अधिकाधिक व्यवसाय मिळवण्याची  स्पर्धाआहे .त्यामुळे जास्तीत जास्त ब्रोकरेज 2.5% पर्यत घेण्याची परवानगी असताना सर्वसाधारण ब्रोकरेज 0.25%ते 1% चे आसपास आहे .सध्या ब्रोकरमधे त्यांच्या कार्यपद्धतीवरून मुख्य असे दोन प्रकार आहेत
                  १.फुल सर्विस ब्रोकर
                  २.डिसकाउंट ब्रोकर
१.फुल सर्विस ब्रोकर :अनेक व्यक्ति , बँका , नॉन बँकिंग कंपन्या या ही सेवा पुरवीत असून त्यांचे सब ब्रोकर किंवा फ्रेन्चायसीचे माध्यमातून स्टॉक कमोडिटी करन्सी मधील सेवा पारंपरिक पद्धतीने गुंतवणुकदाराना देत आहेत  .सर्वसाधारणपणे 3 in 1म्हणजे सेव्हींग ,डी मॅट आणि ट्रेडिंग असे एकत्रित खाते यांचेकडे उघडावे लागते .ब्रोकरेज 1%हून कमी असून काही ठिकाणी किमान ब्रोकरेज म्हणून विशिष्ट रक्कम द्यावी लागते .हे दर एकंदर उलाढालिचे प्रमाणात बदलू शकतात .फोन करून ऑर्डर नोदवणे त्यात बदल करणे रद्द करणे शक्य असून या गोष्टी त्यांनी दिलेल्या पासवर्डचा वापर करून गुंतवणुकदारास संगणक अथवा मोबाईलवरून करता येतात .आपल्या होल्डिंगचे काही पट मार्जीन मिळू शकते .पब्लिक इश्यू , राईट , बाय बॅक सुविधा या साठी त्यांची मदत होते .विविध रिसर्च रिपोर्ट त्यांच्याकडून उपलब्ध होतात . काहीजण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सेवाही देतात .त्याचप्रमाणे काही लोकानी त्यांच्या ग्राहकांसाठी गुंतवणूक मार्गदर्शकाची सोय उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर काही योजनांचे विक्री प्रतिनिधी म्हणूनही ते काम करतात आणि गुंतवणूकदाराना सर्व सेवा एका छताखाली उपलब्ध करून देतात  . जे लोक 100% ऑनलाइन व्यवहार करण्यात अनभिज्ञ आहेत किंवा बाजारात व्यवहार कसे होतात यांची माहीती नाही त्यानी आपले व्यवहार यांच्याकडून करणे योग्य आहे .
२.डिसकाउंट ब्रोकर :गेले 6/7 वर्ष अनेक जण ही सेवा पुरवत असून त्यांच्यामार्फत होणाऱ्या उलाढालित सातत्याने वाढ होत आहे .सध्या राष्ट्रीय शेअर बाजारातील 10% उलाढाल यांच्यामार्फत होत असून तंत्रज्ञानाचा वापर करून जलद गतीने आणि कमीतकमी दलाली (brokarage) घेवून ही सेवा दिली जात आहे .ज्या लोकाना बाजारातील व्यवहारांची माहीती आहे त्यानी कोणावरही अवलंबून न राहता त्यांना स्वतःचे व्यवहार स्वतः करून 80 ते 90% दलालीची रक्कम वाचवता येते .
  फुल सर्व्हिस ब्रोकर आपल्या घराजवळ वैयक्तीक पातळीवर ही सेवा उपलब्ध करून देत आहेत तर  डिसकाउंट ब्रोकर अतिशय अल्प दरात प्रगत तंत्रज्ञानाचे सहायाने अतिशय कमी दरात ह्या सेवा देत आहेत .त्यांचा जास्त भर अधिक उलाढालीवर असून हे लोक विशिष्ठ असे किमान दर न आकारता सेवा देत आहेत .यांची दलाली खूप कमी असून विक्री आणि उलाढाल यावरील खर्च हा पारंपरिक दलालांहून कमी आहे .काही कारणाने फोन करून यांच्यामार्फत व्यवहार करायचे असल्यास त्यासाठी वेगळे  पैसे आकारले जातात .ब्रोकरेज कमी लागत असल्याने डे ट्रेडर आणि डेरिव्हेटिवचे व्यवहार करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात डिसकाउंट ब्रोकरना पसंती आहे .डिसकाउंट ब्रोकर आई पी ओ चे वितरक नसल्याने त्यांच्यामार्फत प्रारंभिक विक्रीचे अर्ज भरता येत नाहीत .गुंतवणूकदाराना ते स्टॉक एक्सचेंजचे वेबसाईटवरून भरावे लागतात .
  या दोन्ही प्रकारातील ब्रोकरची जबाबदारी सारखीच असून डीसकाउंट ब्रोकर कमी ब्रोकरेजवर दर्जेदार  सेवा आपल्या ग्राहकांना देत आहेत .सेबीचे त्यांच्यावर लक्ष असून वेळोवेळी दोन्ही प्रकारच्या ब्रोकरची,  त्यांच्या सेवांची तपासणी करण्यात येवून त्याचे मूल्यांकन केले जाते .दोन्हीही ठिकाणी असलेली गुंतवणूक (पैसे अथवा समभाग)  पूर्णपणे सुरक्षित आहे .
   या दोन्हीही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात फायदे तोटे होत असल्याने अनेक लोक दोन्हीही ठिकाणाहून आपले व्यवहार करीत आहेत .तर ज्यांची उलाढाल जास्त आहे ते आपल्या परंपरागत ब्रोकरकडून दलाली कमी करून घेत आहेत .जे एकदम नवखे आहेत त्यांच्यासाठी फुल सर्विस ब्रोकर योग्य असून त्यांना बाजारातील व्यवहारांचे ज्ञान झाल्यावर डिसकाउंट ब्रोकरकडे जाण्याचा पर्याय योग्य वाटतो .
@उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 3 November 2017

निर्देशांक (Index)

                                                          निर्देशांक (Index)

      आपण एखादी दिशा दाखवण्यासाठी हाताचे जे बोट दाखवतो (चाफेकळी) त्याला इंग्रजीत Index Finger असे म्हणतात .ज्यावरून आपण बाजार कोणत्या दिशेला चालला आहे याचा अंदाज बांधू शकतो त्यांस बाजार निर्देशांक (Index) असे म्हणतात . सध्या Sensex आणि nifty हे शेअर बाजाराशी संबधित निर्देशांक प्रसिद्ध आहेत .
  खर तर कोणत्याही कंपनीच्या शेअरचा भाव हा त्या कंपनीच्या कामगिरीवर असायला हवा परंतू प्रत्यक्षात कंपन्यांच्या बाजारभावात इतर अनेक कारणांनी फरक पडत असतो .सध्या मुंबई शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांची संख्या 8000 हून अधिक तर राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणी कलेल्या शेअरची संख्या 5000 हून जास्त आहे .यांपैकी काही कंपन्याची रोज उलाढाल होतेच असे नाही .काही कंपन्यांचे व्यवहार  कवडीमोल दराने होतात तर काही कंपन्यांचे व्यवहार  त्यांच्या दर्शनी मुल्याच्या अनेक पटीने होतात.  या कंपन्या विविध क्षेत्रांत असून त्यांचे भागभांडवल कमी जास्त आहे .उलाढाल नफा या मधे फरक आहे अशा असमान परिस्थितीत सर्व कंपन्यांची तुलना करून काही ठोस निष्कर्ष काढणे हे अत्यंत अवघड आहे . तेव्हा मुंबई शेअर बाजारातील साधारण महत्वाच्या  सर्व क्षेत्राचा समतोल साधून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 30 कंपन्यांच्या मिळून सेन्सेक्स (Sensitive Index) तर राष्ट्रीय शेअरबाजारातील विविध बारा क्षेत्रातील 50 कंपन्यांचा मिळून निफ्टी(NSE Fifty) बनला आहे .यात सामावेश असलेल्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपिटल म्हणजेच सर्व शेअरचे प्रचलित बाजारमूल्य काढले जाते .या कंपन्यांचे सर्व शेअर बाजारात खरेदी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सचे संख्येने फ्री फ्लोट फॅक्टर काढून त्याला मार्केट कॅपिटलला गुणुन  फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशन काढले जाते .अशा प्रकारे निर्देशांकात समाविष्ट सर्व कंपन्यांच्या फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनची बेरिज केली जाते .
      1एप्रिल 1979 रोजी अशा प्रकारे मुंबई शेअर बाजारातील 30 कंपन्यांच्या फ्री फ्लोट  मार्केट कॅपिटलायझेशनची बेरिज करण्यात येवून 100 हा पायाभूत इंडेक्स धरण्यात येवून त्यानुसार सेन्सेक्सचा इंडेक्स डिवायजर काढला गेला .याने प्रत्येक वेळी फ्री फ्लॉट मार्केट कॅपिटलायझेशनला भागले असता येणारा इंडेक्स म्हणजे त्यावेळचा सेन्सेक्स होय .ही प्रक्रिया दर पंधरा सेकंदाने संगणकामार्फत केली जाते .याच पद्धतीने एन एस सी वरील 50 कंपन्यांचा वापर करून निफ्टी काढला जातो .यासाठी 3 नोव्हेंबर 1995 रोजीची पायाभूत किंमत 1000  पकडण्यात आली आहे .थोडक्यात सेन्सेक्स आणि निफ्टी हे एका विशिष्ट दिवसाच्या तुलनेतील एकत्रित मूल्य आहे .
   जेव्हा एखादा निर्देशांक चढतो/उतरतो  तेव्हा त्यात समाविष्ट सर्वच शेअरचे भाव वाढलेले/पडलेले  नसतात त्याच प्रमाणे ही चढ /उतार सारख्याच प्रमाणात नसते .सर्वसाधारणपणे एका वेळी निर्देशांकात सामावेश असलेल्या सर्व शेअर्सची किंमत एकाच वेळी एका दिशेत जात नसल्याने मोठ्या प्रमाणात समतोल साधला जातो .त्यामूळे निर्देशांकातील चढ उतारामधील  कारणे लक्षात न घेता कोणताही ठोस निष्कर्ष काढणे चुकीचे आहे .शेअर्सचे बाजारमूल्यावरून लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप असे वर्गीकरण करण्यात आले आहे.सध्या 3000 कोटीहून अधिक बाजार मूल्य असलेल्याना लार्ज कॅप , 250 कोटीहून कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्या स्मोल कॅप आणि बाकी सर्व कंपन्यांना मिड कॅप असे समाजण्यात येते .लवकरच यात बदल होणे अपेक्षित आहे यांसंबंधीची सूचना लवकरच निघेल . त्यातील प्रातिनिधिक शेअर्सवरून , निवडक शेअरवरून , विशिष्ट व्यवसायाचे उत्पादन आणि सेवा जसे आटो , पॉवर , बँकिंग , मेटल , फार्मा ई. यावरूनही निर्देशांक बनवले गेले असून ते 'शितावरून भाताची परीक्षा ' या न्यायाने गुंतवणूकदाराना  दिशादर्शनाचे काम करीत आहेत . याशिवाय म्यूचुअल फंडाच्या विविध योजनाच्या गुंतवणूकीस प्रमाण म्हणून मार्गदर्शक ठरत आहेत .तसेच विविध प्रकारच्या डेरेव्हेटीवच्या योजनांचा आधार आहेत . अनेक लोक , सरकार , स्वदेशी आणि परदेशी वित्त संस्था निर्देशांकातिल वाढीस चांगल्या अर्थव्यवस्थेचे प्रतिक असे समजतात . मांत्र  लक्षात ठेवायला हवे की असे निर्देशांक हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत नाहीत .यामुळे कोणत्या प्रकारातील कंपन्या तेजीत /मंदीत आहेत याचा फक्त ढोबळ अंदाजच  बांधता येतो .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 27 October 2017

समभाग संलग्न बचत योजना (ELSS)

समभाग संलग्न बचत योजना (Equity Link Savings Scheme)

  समभाग संलग्न बचत योजना (ELSS) या विशेष प्रकारच्या गुंतवणूक योजना असून त्या म्यूचुअल फंडाच्या पुरस्कार्त्यांकडून राबवण्यात येतात .या योजना निरंतर (Open Ended) किंवा बंदिस्त (Closed Ended) या दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत .यामधे एकरकमी किंवा जमेल तशी गुंतवणूक करता येते .त्याचप्रमाणे त्यात किमान ₹500/-आणि कमाल कितीही रकमेची नियोजनपूर्वक गुंतवणूकही (SIP) करता येते .यामधे केलेल्या गुंतवणुकीवर 80/C च्या विहित मर्यादेत सूट मिळते. लाभांश (Dividend) आणि मूल्यवृद्धी (Growth) हे दोन्ही पर्याय उपलब्ध असून या योजनेस लाभांश पुर्नगुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय  उपलब्ध नाही .या योजनेतीली 80% रक्कम ते अनुकरण करीत असलेल्या इंडेक्स मधील वैविद्यपूर्ण (Diversified) अशा समभागात जसे S&P nifty किंवा S& P nifty 500  या इंडेक्समधील समभाग आणि 20% रक्कम डेट , मनी मार्केटमधे गुंतवली जाते .(अधिक तपशिलासाठी योजनेचे मागणीपत्र पहावे)
    सध्या मान्यताप्राप्त निवृत्तीयोजनेची वर्गणी (PF, VPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) , विमा हप्ते , गृहकर्ज परतफेड ,शैक्षणिक फी , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) ,  करबचत मुदत ठेवी (Tax Saving FDR) , सुकन्या समृद्धी योजना (SSY) , वरीष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) साधनातील गुंतवणुकीला दीड ते दोन लाख या मर्यादेत आयकर कलम 80/सी खाली आयकर सवलत मिळते .
    यातील काही योजनांचा परतावा (Return) मिळतो तो योजनेच्या प्रकारानूसार करमुक्त असतो किंवा नसतो .त्याचप्रमाणे यातील बहूतेक योजनांचा गुंतवणूककाळ हा किमान पाच वर्षे तरी असतोच .पी एफ , व्ही पी एफ यांना सध्या 8.65%करमुक्त उतारा मिळत असून त्यांचा गुंतवणूक कालावधी प्रदीर्घ आहे . पी पी एफ व  एन एस सी मधून मिळणारा उतारा (Return) वार्षिक  7.8% आहे यातील एन एस सी मधील पहिल्या 4वर्षात मिळालेले व्याज हे उत्पन्न करपात्र समजले जाते आणि त्याला पुनर्गुतवणूक केल्याचा फायदा मिळतो तर अंतिम वर्षात ती होत नसल्याने करपात्र उत्पन्नात मिळवले जाते  .पी पी एफ मधील उत्पन्न करमुक्त परंतू यातील रक्कम पाच वर्षाहून अधिक काळ अडकून राहते  . टॅक्स सेविंग एफ डी मधून पाच वर्षात मिळणारा उतारा 7ते 7.5% असून तो करपात्र आहे .एन पी एस मधून मिळणारा उतारा हा योजनेनुसार आणि दीर्घ काळ असून त्याची निश्चित अशी हमी नसल्याने ज्यांची दीड लाख गुंतवणूक पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्याकडे जास्तीचे पैसे आहेत अशा लोकांना पन्नास हजारांची अधिकची करसवलत घेण्यास योग्य आहे .
   एस एस वाई (सुकन्या समृद्धी) ही योजना मुलींनी स्वावलंबी व्हावे यासाठी असून त्यातील गुंतवणूक मुलीच्या वयानुसार 14 ते 21वर्षपर्यंत अडकून राहते आणि ती संबधित मुलीलाच मिळते .सध्या यातून मिळणारा परतावा 8.3% असून तो करमुक्त आहे . तर एस सी एस एसही योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांसाठी असून यातून दर तीमाहीस मिळणारे 8.3% व्याज करपात्र आहे .ही गुंतवणुक पाच वर्ष कालावधीसाठी आहे .
  या सर्व योजनांच्या तुलनेत ई एल एस एस ही कोणतीही निश्चित हमी न देणारी योजना आहे . भविष्यात भांडवल उभारणी करण्यासाठी जोखिम स्वीकारण्याची तयारी असलेल्या प्रत्येकास उपयुक्त आहे .या योजनेचा किमान गुंतवणूक कालावधी तीन वर्ष असून हा कालावधी संपला तरी गुंतवणूक काढून घेण्याचे बंधन नसते .यावर मिळणारा डीवीडेंड त्याचप्रमाणे भांडवली नफा हा पूर्णपणे करमूक्त आहे . moneycontrol चे संकेतस्थळावर 26 ऑक्टो 2017 रोजी उपलब्ध असलेल्या माहीती प्रमाणे मूल्यांकनानूसार (Top Ranking   Scheme) एल अॅड टी टेक्स अँडव्हाटेंज ही योजना प्रथम स्थानावर असून त्याचा मागील वर्षाचा परतावा 25% तर मागील तीन वर्षाचा सरासरी परतावा 17.8% आहे .येथेच उपलब्ध  योजनांचे  कामगिरीनुसार (Top Performing Scheme) एस बी आई टॅक्स अँडव्हांटेज स्कीम 2 ,रिलायंस टॅक्स सेवर फंड , आई सी आई सी आई प्रू राइट फंड , अॅक्सीस लॉग टर्म ईक्विटी फंड , प्रिन्सिपल टॅक्स सेविंग यातून मिळालेला गेल्या पाच वर्षाचा सरासरी परतावा 22% हून आधिक आहे .
    या योजनांत गुंतवणूक करतांना निश्चितच धोका आहे परंतू यातून मिळणारा परतावा पाहिला असता थोडी जोखिम (Calculated Risk) पत्करली तर अल्पमुदतीत  अधिक आकर्षक उतारा भांडवलवृधी होण्याची खात्री आहे आणि त्यासाठी अनेक फंड हाउस कडील आकर्षक योजनांचा पर्याय उपलब्ध आहे .याशिवाय थोडे थांबण्याची तयारी असेल तर नुकसान होण्याची अजिबात  शक्यता नाही .हा दृष्टीकोन ठेवून अशा योजनांचा विचार धाडसी गुंतवणुकदारांनी करावा .
  (यात उल्लेख केलेल्या योजना संदर्भासाठी  www.moneycontrol.com या संकेतस्थळावरून घेतल्या असून त्या  केवळ अभ्यासासाठी आहेत , त्यांची शिफारस केलेली नाही. आपण आपली गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करून योजना समजून घेवून स्वतःचे जोखमीवर करावी)

©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

म्यूचुअल फंडाच्या योजनांचे नविन वर्गीकरण

म्यूचुअल फंडांच्या योजनांचे नविन वर्गीकरण

   म्यूचुअल फंडांच्या विविध योजना , त्याच्या  गुंतवणूक कालावधीवरून ओपन एंडेड आणि क्लोस्ड एंडेड अश्या दोन प्रकारांत आहेत .गुंतवणूक साधनांवरून ईक्विटी , डेट , हायब्रीड आणि मनी मार्केट  फंड या चार प्रकारात आहेत .उत्पन्न विभागणी वरून डीवीडेंड आणि ग्रॉथ या दोन प्रकारात तर ई ल एस एस , पेन्शन या सारख्या योजना इतर विशेष प्रकारच्या योजना अशा प्रकारात विभागल्या आहेत . बाजारात 42 म्यूचुअल  फंड हाउसनी अश्या प्रकारच्या 2000 हून अधिक योजना बाजारात आणल्या असून त्यांना आकर्षक नावेही दिली  आहेत . यामुळे गुंतवणुकदारांना निश्चित अर्थबोध होत नाही त्यामुळे गुंतवणुक निर्णय घेण्यात गोंधळ होवू शकतो .सप्टेंबर 2017 अखेर सर्व योजनांतील एकत्रित गुंतवणूक 20.4 अब्ज एवढी आहे .
   यामुळे बाजारात विविध योजनांची भाऊगर्दी झाली असून एका फंड हाउस कडून एकाच प्रकारच्या अनेक योजना बाजारात आल्याने सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात गोंधळ उडाला आहे .यावर उपाययोजना म्हणून 6ऑक्टोबर 2017 रोजी सेबीने सर्व फंड हाउसना एक परिपत्रक पाठवून त्यांच्याकडील सर्व निरंतर योजनांची (open ended scheme) विभागणी पाच प्रकारांत करण्यास सूचवले आहे . त्यांचे ठळक उपप्रकारही सूचवले आहेत .
  सेबीनी म्यूचुयल फंडाना त्यांच्या योजनांची त्यांच्या गुंतवणूक साधनावरून :
१.डेट स्कीम :कर्जरोखे , बॉन्ड , कमर्शियल पेपर यातील गुंतवणूकीच्या या योजना असून त्यांचे 1)Overnght 2)Liquid 3)Ultra short duration 4)Low duration 5)Money market 6)Short duration 7)Medium duration 8)Miedium to long duration 9)Long duration 10)Dynamic bond 11)Corporate bond 12)Credit risk fund 13)Banking &PSU 14)Gilt 15)Gilt with 10-year duration 16)Floater हे उपप्रकार सूचवले आहेत .
 २.ईक्विटी स्किम :फक्त समभागाशी संबधित या योजना असून यांचे 1)Multi cap 2)Large cap  3)Large & midcap 4)Midcap 5)Small cap 6)Dividend yield 7)Value 8)Contra 9)Focused 10)Sectoral themes -ELSS असे उपप्रकार सूचवले आहेत .
३. हायब्रीड फंड :यामधे समभाग आणि रोखे या दोन्हीचाही सामावेश असेल .यांचे 1)Conservative 2)Balanced 3)Aggressive 4)Dynamic asset allocation 5)Malti asset allocation 6)Arbitrage
४. सोल्युशन ऑरियेंटेड :यामधे एखादा ऊद्धेश ठेवून गुंतवणूक केली जाईल .जसे 1) Retirement   2)Children benefit
५.इतर प्रकारच्या योजना:वरील निकषात न बसणाऱ्या योजना 1)Index fund / ETF 2)FOF -Funds of funds -overseas/domestic
  अश्या पाच विभागात वर्गीकरण करण्यास सूचवले असून त्याचे 36 उपप्रकार सूचवले आहेत .यामधे इक्विटी योजना ज्यामुळे ही गुंतवणूक कोणत्या ठळक प्रकारांत आहे ते अधिक स्पष्ट होईल . उदाहरणार्थ डीवीडेंड यील्ड ईक्विटी फंड यातील गुंतवणूक ही फक्त जेथे अधिक लाभांश उतारा मिळेल अशाच समभागात (Specific to)केली जाईल तर बँकिंग अँड पी एस यू डेट   फंड ह्या फंडातील गुंतवणूक बँक आणि पी एस यू चे कमर्शीअल पेपरमधे केली जाईल .जरी हे उपप्रकार विविध 36 प्रकारात विभागले असले तरी त्यातून निश्चित अर्थबोध होईल .सोल्युशन ऑरियेंट योजनांचा नेमका  गुंतवणूक कालावधी किती असावा ते ठरवावे लागेल .तसेच कंपनीचे मार्केट कॅपिटलायजेशन वरून पहिल्या 100 म्हणजे लार्ज कॅप , 101ते 250 वरून मिड कॅप आणि 251 पुढील सर्व स्मॉल कॅप असे ठरवावे आणि त्यातच गुंतवणूक करावी लागेल आणि समजा जर योजना स्मोल कॅप असेल तर 80% रक्कम नव्याने तयार केलेल्या स्मॉल कॅपमधे करावी लागेल .एका फंड हाउसची एका उपप्रकाराची एकच योजना असेल .इंडेक्स फंड , ई टी एफ , सेक्टरल फंड यासारखे अपवाद वगळता सध्या अस्तित्वात असलेल्या सारख्या योजना एकमेकात विलीन करणे अथवा बंद करणे या संबंधी फंडाचे मत आणि भविष्यातील योजना यासंबंधीची माहीती,  यातील कोणत्याही प्रकारांत न बसणाऱ्या योजनांची माहीती विहित नमुन्यात सेबीकडे दोन महिन्यात देवून आवश्यक त्या उपाययोजनांना मंजूरी घेवून पुढील तीन महिन्यात त्याची अमलबजावणी करायची आहे .
   म्यूचुअल फंड व्यवसायाच्या दृष्टीने हे आमूलाग्र बदल होईपर्यंत अल्पकाळासाठी ही थोडी कठीण परिस्थिती असेल .काही तज्ञांच्या मते दोन योजनांच्या विलिनीकरणामुळे योजनेच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात वाढ होईल त्याचा कामगीरीवर परिणाम होवू शकेल . नविन वर्गीकरणामुळे अधिक गोंधळ होवून म्यूचुअल फंडापासून गुंतवणूकदार दुरावण्याची शकता आहे .हे नियम निरंतर (open ended ) योजनांना लागू असल्याने अनेक बंदिस्त योजना (closed ended)  यापुढे बाजारात येण्याची शक्यता आहे . तर सेबीचे मतानुसार या बदलामुळे  येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या फंड हाउसची एक प्रकारची योजना आणि एक प्रकाराची गुंतवणूक पद्धत असल्याने त्यांच्या कामगीरीचा आढावा घेवून तुलना करणे सहज कोणालाही शक्य होईल त्यामुळे सामान्य गुंतवणुकदारांला त्याच्या गरजेनुरुप जोखिम पत्करून फंडाची निवड सहज करता येईल .याचे फलित काय होईल ते नजीकच्या काळात कळेलच .

उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 13 October 2017

सोन्यातील गुंतवणूक

                                                                  सोन्यातील गुंतवणूक
  सोने हा धातू हा भारतीयांच्या (विशेषतः  स्त्रियांच्या) जिव्हाळ्याचा विषय आहे .जरी सोन्याऐवजी इतर अनेक धातू , प्लास्टिक , लाकुड , शिंपले कागद यापासून दागिने बनवता येत असले तरी सर्वांची पसंती ही सर्वप्रथम सोन्यास असते .सोन्याची साठवणूक करताना असलेली जोखिम , दागिने करताना त्यात करावी लागणारी अन्य धातूंची मिसळ करण्याची आवश्यकता , दागिने मोडतांना येणारी घट  आणि बी एस आई या प्रामाणिकरणाची नसलेली सक्ती यामुळे आज अनेक गुंतवणूकतज्ञ सोन्यामधील गुंतवणूक फारशी लाभदायक नाही असे सांगतात. तरीही अनेक सराफांकडील दुकानातील गर्दी पहाता यामधे नजीकच्या काळात यात फार काही फरक पडेल असे वाटत नाही .
   भारतात दरवर्षी चार टन सोने उत्पादित होत असताना आपण आठशे टन सोने आयात करतो .वर्ड गोल्ड कौन्सिलच्या मतानुसार सोने आयातीत आपला देश प्रथम क्रमांकावर आहे .आपल्या चालू खात्यात येणारी तूट म्हणजे आयात आणि निर्यात यातील फरक  (current account deficit ) येण्यास सोन्याची आयात हे महत्वाचे कारण आहे . भारतीयांची मानसिकता , सराफांची एकाधिकारशाही , सरकारची  राजकीय अपरिहार्यता  आणि अधिक कर आकारणीमुळे बेकायदा व्यवहारात होणारी वाढ यामुळे ही तूट कमी करण्यावर अनेक बंधने येतात .भारतीयांकडे आणि येथील अनेक मोठ्या देवस्थानांकडे कित्येक टन सोने साठून राहिल्याने मोठ्या प्रमाणात भांडवल त्यात अडकून पडले आहे .
   अनेक जण परंपरेप्रमाणे सणासुदीला , वाढदिवसाला , लग्नाला  सोने किंवा दागिने खरेदी करतात अडीअडचणीस उपयोगी येईल म्हणून ही खरेदी केली जाते .आपल्या उत्पन्नातील सरासरी तेरा टक्के रक्कम यात अडकवली जात असून  प्रत्यक्षात अगदीच नाईलाज झाला  तरच त्याची विक्री केली जाते .सहसा यातून पैसे मिळवावे हा हेतू नसतो . त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम अडकून रहाते . यातून कोणत्याही प्रकारची भांडवलनिर्मिती होत नाही .
    यामधे बदल व्हावा म्हणून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत .यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF), सुवर्ण चलनीकरन योजना (Gold Monitization  Scheme) ,सुवर्ण सार्वभौम योजना (Gold Sovergine Scheme) आणि सोन्याचे वायदे व्यवहार (Gold Futures) यांचा सामवेश आहे .यामुळे धातुस्वरूपात ते न घेता अमूर्त स्वरूपात साठवता येते  आणि गरज पडल्यास विकताही येते .त्यावर अल्प प्रमाणात उत्पन्नही मिळते .याला टक्कर देण्यासाठी  काही मोठ्या काही सराफानी बॉन्ड अथवा ई टी एफ स्वरूपातील सोन्याचे यूनिट खरेदी करून त्याचे दागिने बनवण्याच्या योजनेचा चालू केल्या आहेत . अनेकांच्या सुवर्ण खरेदीच्या योजना असून दरमाह एक ग्राम सोने खरेदी केले असता अंतिम मुदतीला बोनस म्हणून सोने दिले जाते तर अनेक सोनार रिकरिंग योजनेप्रमाणे हप्ता घेत असून व्याज म्हणून शेवटचा देत असतात .यातून जमा रकमेवर व्याज म्हणून एक हप्ता भरला जातो .जमा रकमेचे सोने अथवा दागिने घेतले जातात .व्याज या दृष्टीने सोन्यावर व्याज म्हणून सोने  मिळणाऱ्या योजना अधिक फायद्याचा आहेत .काही जणांनी स्वतच्या खाजगी गोल्ड डिपोसिट योजना चालू केल्या असून यावर अधिक व्याज देवू केले आहे .
   आवश्यकता नसताना धातुस्वरूपात सोने खरेदी करण्याऐवजी ते  ई गोल्ड स्वरूपात खरेदी करणे हे  करसवलतीच्या दृष्टीने अधिक फायद्याचे  आहे . या स्वरूपातील गुंतवणूकीवर दीर्घकालीन भांडवल करावरील लाभ ई टी एफ ला एक वर्षानी तर ई गोल्ड यूनिटला  तीन वर्षाच्या मुदतीने घेता येतो . फंडहाउस कस्टोडीयन अथवा डिपॉझिटरीकडे सदर यूनिट मधील सोने सुरक्षित रहात असून यास नामांकन सुविधाही उपलब्ध  आहे. सोन्यातील भावात होणाऱ्या चढ उताराचा लाभ घेण्यासाठी यातील वायदे व्यवहार उपयुक्त असून यासाठी लागणारे मार्जीन अत्यल्प आहे . याशिवाय  या व्यवहारांना एक्चेंजची हमी आहे आणि आवश्यकता असल्यास त्याची डिलिवरीही घेण्याचा पर्यायही आहे .तेव्हा यापुढे सोने खरेदी करताना या सर्वच गोष्टींचा विचार करावा .

©उदय पिंगळे

Friday, 6 October 2017

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे भाग -३

चांगले समभाग शोधण्याचे साधन - विविध गुणोत्तरे (Financial Ratios) भाग ३
ऊ .इफिशियन्सि रेशो : कार्यक्षमतेच्या या रेशोमुळे कंपनी आपली मालमत्ता , भागभांडवल , घेतलेली कर्जे यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून किमान खर्चात कमाल उत्पादन करते का ?ते समजण्यासाठी मदत होते .
१.वर्किंग कॅपिटल टर्नओवर रेशो :निव्वळ उलाढालिस वर्किंग कॅपिटल म्हणजेच चालू मालमत्तेमधून चालू देयता (liabilities) वजा करून आलेल्या संख्येने भागले तर हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा जास्त तेवढे चांगले .
२.रिसिव्हेबल टर्नओवर :या मध्ये निव्वळ उलाढालिस  येणे बाकी असलेल्या रकमेने भागले जाते .येणे रक्कम जेवढी कमी तितका भागाकार वाढेल .हा रेशो काळजीपूर्वक काढणे जरुरीचे आहे .
३.इनव्हेटरी टर्नओवर रेशो :उत्पादनातील कच्चा माल , अर्धवट प्रक्रिया झालेला माल आणि उत्पादित परंतु शिल्लक माल यास इनव्हेटरी असे म्हणतात त्यांस विक्री झालेल्या उत्पादित मालास आलेल्या खर्चाने हा रेशो मिळतो .हा रेशो खूपच फसवा असून इनव्हेटरी कमीत कमी असणे त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे .
४.प्राईज अर्निग रेशो :PE या संक्षिप्त नावाने प्रचलित आहे .चालू बाजारभावास प्रतिशेअर कमाई (EPS) भागले असता हे गुणोत्तर मिळते .हा रेशोच्या अनुरूप शेअरचा भाव असता तर त्याविषयी निर्णय घेणे सोपे झाले असते परंतू प्रत्यक्षात अनेक कारणांनी भाव वाढतात आणि हा रेशोही बदलतो .एकदम नामवंत कंपन्या सोडल्यास हा 15/17 असणे चांगले .परंतू हा नियम नाही अनेक नामवंत कंपन्यांचा पी ई सातत्याने 40/45 आहे .
५.कॅश अर्निग पर शेअर :करपश्चात नफ्यास शेअरचे संख्येने भागले की हा रेशो मिळतो .याची तुलना मागील वर्षाशी करता येते .
६.डिव्हिडेंड पे आउट रेशो :शेअरहोल्डरना वाटलेल्या डिव्हीडेंडला करपश्चात नफ्याने भागले असता हा रेशो मिळतो .चांगल्या कंपन्याचे बाबतीत हा रेशो 40:60 याप्रमाणात असतो .गुंतवणूकदार त्यांना लगेच फायदा दिसत असल्याने जास्त रेशो असलेल्या कंपन्या पसंत करतात .परंतू एका विशिष्ट मर्यादेपेक्षा या कंपन्याची प्रगती थांबते .तेव्हा हा रेशो कमी असणे अधिक चांगले असते .
७.डिव्हिडेंड रेट :कंपनीने एका शेअरवर दिलेल्या डीवीडेंडला शेअरच्या मूळ  किंमतीने भागुन 100ने गुणले असता हा रेशो मिळतो तो नेहमी %मधे दर्शवला जातो
८.डिव्हिडेंड यिल्ड :एका शेअरवर मिळालेला डिव्हिडंडला चालू बाजारभावाने भागून 100ने गुणले असता हा रेशो मिळतो .याने सध्या मिळणारा उतारा कळतो .
९.बुक व्हॅल्यु : भागभांडवल आणि गंगाजळी यांच्या बेरजेस एकूण शेअर्सचे संख्येने भागले असता हा रेशो मिळतो .जेवढी बुक व्हॅल्यु जास्त तेवढा रिझर्व जास्त असल्याने काही कारणाने कंपनी बंद झाल्यास शेअर होल्डरना तेवढी रक्कम मिळण्याची हमी असते . गंगाजळी जास्त असल्याने बोनस शेअर मिळण्याची शक्यता जास्त .
१०.प्राईज अर्निग ग्रोथ : पी ई रेशोला वाढीचा दराने भागले असता हा रेशो मिळतो .
११.मार्केट टू बुक रेशो :बाजारभावास बुकव्हॅल्युने भागले असता हा रेशो मिळतो .यावरून बाजारभावाच्या किती पट संपत्ती निर्माण झाली ते समजते .
अमुक एक रेशो वापरून चांगली कंपनी शोधता येईल असे ठामपणे सांगता येणार नाही .परंतु एकाच  प्रकारच्या आणि सारखीच उलाढाल असलेल्या कंपनीच्या प्रगतीची तुलना करून आंदाज बांधता येतो .एकाच प्रकारचा निकष दुसऱ्या प्रकारच्या कंपनीला लावता येत नाही .त्याचप्रमाणे तुलना करीत असलेली कंपनी नविन आहे की प्रस्थापित आहे तेही पहावे लागते .या गोष्टी बारकाईने लक्षात ठेवल्या तर आपले अंदाज बरोबर ठरायला मदत होते .(संपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

SIP नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना

नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना  (SIP म्हणजेच Sistemetic Investment Plan)
   सर्वसाधारणपणे म्यूचुअल फंडाचे संबंधी SIP हा शब्द वारंवार ऐकण्यात येतो .SIP हे कोणत्याही गुंतवणूक योजनेचे नाव नसून म्यूचुअल फंडाच्या   नियोजनपूर्वक गुंतवणूक करण्याची एक  पद्धत आहे . सर्वाना म्यूचुअल फंड म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते याविषयी माहीती असेल असे मी येथे गृहित धरले आहे .ज्यांना ही माहीती नसेल त्यांच्यासाठी म्यूचुअल फंडाची माहीती असलेला यापूर्वीचा  लेख वाचावा आणि नंतर हा लेख वाचावा म्हणजे एस आई पी विषयी चांगले समजेल कोणतीही गुंतवणूक ही आपली अल्प , मध्यम , दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण व्हावित यासाठी केली जात असून  त्यासाठी लागणारी रक्कम आपल्याकडे लवकरात लवकर जमा व्हावी आणि अधिक फायदा व्हावा या हेतूने केली जाते .यातील दीर्घ /प्रदीर्घ कालवधीतील उद्दिष्टे उदा .मुलांचे उच्च शिक्षण ,लग्न , घर घेणे , निवृतीनंतरचे नियोजन पूर्ण करण्याकरीता महागाईचा दर लक्षात घेवुन तजवीज करावी लागते . यासाठी 10/30 वर्षांचा कालावधी असतो तर काही उद्दिष्टे अल्पकालीन असतात कालावधी 6 महीने तर काही मध्यम स्वरूपाची असतात कालावधीत 3 ते 7 वर्ष .एकदा उद्दिष्ट , त्यासाठी लागणारी रक्कम , अपेक्षित परतावा आणि जोखिम घेण्याची क्षमता या गोष्टी ठरल्या की आपल्याकडे असलेली गुंतवणूक योग्य रक्कम , योग्य योजनेची निवड करून त्यात टाकू शकतो . ही ठराविक रक्कम ठराविक मुदतीने ठराविक काळाने  गुंतवणे (रिकरिंग डिपोझिट प्रमाणे) यास नियोजनपूर्वक गुंतवणूक योजना (sip) असे म्हणतात . बाजारातील चढ उताराप्रमाणे यूनिटचे निव्वळ मालमत्तामूल्य (nav) कमी अधिक होत असते . एक रकमी केलेली गुंतवणूक जर बाजार नीचांकी पातळीवर असेल तरच फायदेशीर होवू शकते  . याचा निश्चित असा अंदाज बांधणे कठीण आहे त्यामुळे अशी संधी शोधण्याऐवजी sip करणे हे अधिक योग्य.या मध्ये nav कमी अथवा जास्त असेल तर मिळणारे यूनिट सरासरी मूल्याने (Rupee  cost averaging) मिळत असल्याने धोका कमी संभवतो .जर nav कमी असेल तर जास्त यूनिट येतील तर nav जास्त असेल तर कमी यूनिट येतील .मोठ्या कालखंडात जमा झालेले यूनिटवर चक्रवाढ व्याजाने वाढत जाणारी रक्कम आणि जमा मूद्दल यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा होवून जोखिम तीव्रता कमी होवू शकते .अशा प्रकारची गुंतवणूक पेन्शन योजनेतही करता येवू शकते . म्यूचुयल फंडातील समभाग  संलग्न बचत योजनेत (Equity link savings scheme ) किमान ₹500/- तर इतर योजनात ₹1000/- दरमहा भरून किमान 6 महीने ते कमाल आपल्या इच्छेनुसार करता येते .म्यूचुअल फंडाच्या पुरस्कर्त्यानी गुंतवणूकदारांच्या सोइसाठी दैनिक , साप्ताहिक , पाक्षिक ,मासिक , त्रैमासिक कालावधीत गुंतवणूक करता येवू शकेल किंवा ठराविक काळाने आपली गुंतवणूक रक्कम वाढवता  येवू शकेल अथवा मिळालेल्या डीवीडेंडची रक्कम यूनिट्स मधे परावर्तित करता येईल असे पर्याय देवू केले आहेत .
शेअर असो अथवा म्यूचुअल फंड यूनिट किमान भावात खरेदी आणि कमाल भावात विक्री झाली तरच जास्त फायदा होवू शकतो .यासाठी ठराविक दिवशी ठराविक किंमतीचे शेअर अथवा यूनिट सातत्याने घेतल्यास बाजार वाढला अथवा कमी झाला तरी सरासरी मूल्यांचा फायदा होवू शकतो . सीप पद्धत कोणत्याही प्रकारची फायद्याची हमी देत  नसली तेजी आणि मंदी दोन्हीमधे या पद्धतीपासून प्रदीर्घ कालावधीत तोट्यापासून संरक्षण होत  असल्याने  अंतिमतः गुंतवणूकदाराचा फायदाच होतो .अशाच प्रकारची गुंतवणुक म्यूचुअल फंडातील यूनिट्स शिवाय विशिष्ट समभागात ठराविक दिवशी  करून दीर्घकाळात त्याची खरेदी किंमत कमी करता येणे शक्य आहे .ज्यायोगे भविष्यात बाजारमूल्य अधिक असताना त्याची विक्री करून अधिक फायदा मिळवून आपले ध्येय मुदतीपुर्वी करता येवू शकेल .
©उदय पिंगळे


Friday, 29 September 2017

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे भाग -२

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे            (Financial Ratios) भाग -२

आ .लिक्विडिटी रेशो :  नजीकच्या काळात अपेक्षित असलेली अल्प आणि दीर्घ मुदतीची देणी देण्याची क्षमता म्हणजे लिक्विडिटी यामुळे कंपनी आर्थिकदृष्टा किती सक्षम आहे ते समजते .
१.करंट रेशो :हे गुणोत्तर मालमत्तेला (current asset)देणीनी (current liyablities) भागून  मिळते .मालमत्तेमधे रोख रक्कम , रोख्यातिल गुंतवणूक , शिल्लक कच्चा माल , उत्पादित माल , विविध येणी आणि उचल इत्यादी . तर करंट लियाबलिटीमधे घेतलेली कर्जे , आगाऊ रकमा व्यावसायिक देणी आणि अपेक्षित खर्चाची तरतूद इत्यादी .थोडक्यात येणे भागिले देणे .जर जर अॅसेट हे लियबलिटीचे दुप्पट असणे ही एक आदर्श व्यवस्था मानली जाते .जर हा रेशो 2हून बराच अधिक असेल कंपनीचे अॅसेट पुरेशा प्रमाणात बापरले जात नाहित असा याचा अर्थ होतो तर जर हा रेशो 1हून कमी असेल तर भविष्यात कंपनी वर मोठे आर्थिक संकट  येवू शकते .
२.क्विक रेशो :हा ही एक करंट रेशोच असतो मात्र यात कच्चा माल धरला जात नाही जाचे तात्काळ रोखीकरण होवू शकते तेवढ्या मालमत्ता यात धरल्या जातात .या मुळे अल्प काळातील देणी देण्याची तयारी समजते .हा रेशो 1किंवा त्याहून अधिक असणे चांगले तर 1हून कमी असणे चिंताजनक असते .या रेशोस अॅसीड टेस्ट रेशो असेही दूसरे नाव आहे .
इ .सॉल्व्हन्सी रेशो :या रेशोमुळे कंपनीने घेतलेल्या विविध कर्जामुळे ती दिवाळखोरीच्या मार्गावर तर नाहीना हे समजते .
१.डेबिट ईक्विटी रेशो : हा रेशो काढताना कंपनीची सर्व कर्जाना भांडवलाने भागले जाते .हा तेशो कमीत कमी असणे हे चांगल्या कंपनीचे लक्षण आहे .
२.डेबट अॅसेट रेशो : -हा रेशो काढताना सर्व कर्जाला भांडवल आणि गंगाजळी या मालमत्तेने भागले जाते . कर्जाहुन मालमत्ता जास्त असेल तर कंपनी चांगली आहे म्हणू शकतो .
ई .कव्हरेज रेशो :कंपनीची आर्थिक स्थिति यावरून समजते .
१.इंटरेस्ट कव्हरेज रेशो :व्याज आणि विविध कर देण्यापूर्वीच्या उत्पन्नात घसारा मिळवून त्यांस व्याजाने भागून हे गुणोत्तर मिळते जर हा रेशो छोटा असेल तर व्याज भरण्यासाठी कंपनीला अडचण येवू शकते .ह्या रेशोची तुलना गेल्या वर्षीच्या रेशोशी केली जाते .त्यावरुन कंपनीची आर्थिक स्थिति कशी आहे ती मागच्या वर्षाच्या तुलनेने बिघडली की सुधारली ते समजते
२.डेट सर्व्हिस कव्हरेज रेशो :निव्वळ नफ्यात घसारा , व्याज आणि कर यांची रक्कम मिळवून त्यांस  कर्जफेडिची मूद्दल आणि व्याज यांच्या बेरजेने रकमेने भागले हा रेशो मिळतो हा रेशो लक्षात घेताना मागील कामगिरीचा विचार करतात हा रेशो कमी असल्यास कंपनी डबघाईस जाण्याची शक्यता असते .
३.डिव्हीडंड कव्हरेज रेशो :कंपनीच्या प्रेफरन्स शेअरच्या डिव्हिडंड रकमेने करपश्चात नफ्यास भागले की हा रेशो मिळतो .हा रेशो जेवढा मोठा तेवढी कंपनी सुधृढ समजली जाते .
उ.प्रोफिटेबिलिटी रेशो :कंपनीला होणारा फायदा या रेशोमुळे अधिक चांगल्या रीतींने समजुन येतो .
१.ग्रॉस /नेट /ऑपरेटिंग प्रॉफिट मर्जीन रेशो :निव्वळ उत्पादन खर्चास  निव्वळ विक्रिने भागून ग्रॉस प्रॉफिट मर्जीन रेशो तर करपश्चात नफ्यास निव्वळ विक्रिने भागून नेट प्रॉफिट मर्जीन रेशो मिळतात .ऑपरेटिंग प्रॉफिट मर्जीनला निव्वळ नफ्याने भागून ओपेरेटिंग प्रॉफिट मार्जीन रेशो मिळतो त्यांस 100 ने गुणले असता %मिळते  .ऑपरेटिंग प्रॉफिट काढताना कर , घसारा व्याज ही रक्कम वजा करण्यापुर्वीची रक्कम धरण्यात येते .या सर्व रेशोंची तुलना मागील वर्षाशी करण्यात येते .
२.रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड आणि रिटर्न ऑन नेट्वर्थ : घसारा व्याज आणि कर वजा न करीता निव्वळ उलाढालीस स्थिर मालमत्ता आणि भांडवल यांच्या बेरजेने भागले असता रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोइड हा रेशो मिळेल करोत्तर नफ्यास भांडवल गंगाजळीच्या बेरजेतून संचित तोटा वजा करून भागले असता रिटर्न ऑन नेटवर्थ हा रेशो मिळतो .येणाऱ्या रेशोस 100 ने गुणले की %मधे रेशो मिळतो .हे रेशो मागील वर्षाशी तुलना करून जेवढे अधिक असतील तेवढे चांगले .(अपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .
‌‌

Friday, 22 September 2017

चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे (Financial Ratios)भाग -१

 चांगले समभाग शोधण्याचे साधन -विविध गुणोत्तरे (Financial Ratios) भाग -१
  चांगले समभाग (Share) म्हणजे गुंतवणूकीदाराच्या दृष्टीने अशा कंपनीचे समभाग जी कंपनी सातत्याने नफा मिळवत असून ठराविक अंतराने गुंतवणुकदाराना बोनस हक्कभाग देते , लाभांश देते .काळानूरूप आपल्या व्यवसायात बदल करून सातत्याने प्रगती करते .अश्या कंपनीचे समभाग आपल्या गुंतवणूक संचात (Portfolio) असावेत .ज्यांच्याकडे ते आहेत त्यांना ते शक्यतो विकु नयेत असे वाटते .या समभागाच्या मागणीपेक्षा पुरवठा नेहमीच कमी असल्याने त्यांच्या किंमती सातत्याने वाढत असतात .
   बाजारात गुंतवणूक करणारे वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार अंदाजाने तसेच विविध मूलभूत , तांत्रिक विश्लेषणाचे सहाय्याने याचा अभ्यास  करीत असतात .यासाठी कंपनीचा जमा खर्च , वार्षिक अहवाल , संचालकांच्या  मुलाखती , बाजारतील बातम्या उपलब्ध सर्व माहीती याचा एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे वापर करीत असतात .यातील काही गोष्टींचा दुसऱ्या गोष्टीचा असलेला संबध म्हणजे गुणोत्तर .यामुळे प्राथमिक अंदाज बांधता येतो .अनेक प्रकारची गुणोत्तरे तयार उपलब्ध आहेत त्यामुळे ती काढण्याचा त्रास नाही , परंतू त्यातून काय अर्थबोध घेता येतो ते महत्वाचे आहे .काही महत्वाची गुणोत्तरे यातून समजावून घेवूया .
अ .प्रत्यक्ष शेअरशी संबधित गुणोत्तरे (Ratios)
१.E P S : अर्निग पर शेअर रेशो , हे अतिशय प्राथमिक गुणोत्तर असून ते कंपनीला झालेला करपश्यात नफ्यास (Net Profits) शेअरहोल्डरचे ताब्यात असलेल्या (outstanding) संख्येने भागले असता मिळते .यावरून कंपनीने प्रति शेअर किती रुपये कमावले ते समजते .समजा एखाद्या कंपनीने त्यांच्या 10 ₹ मूल्य असलेल्या शेअरवर 15रूपये प्रतिशेअर कमाई केली तर प्रथम दर्शनी ती कंपनी चांगली असे कोणीही म्हणेल .परंतू या कंपनीचा नफा सातत्याने वाढतोय का? अशाच प्रकारच्या दुसऱ्या कंपन्यांच्या तुलनेत (peer compering) तो किती आहे ते शोधता येते . अनेकदा कंपन्या त्यांचे सर्व समभाग विक्रीसाठी काढत नाहीत किंवा असलेल्या शेअरची पुनर्खरेदी करतात .शेअरहोल्डर ते ताब्यातील शेअर्सची संख्या विचारात घेताना हे पहाणे जरुरीचे आहे .अमुक एक इ पी एस असणारी कंपनी म्हणजे चांगली कंपनी असे सांगता येवू शकत नाही .कंपनीचा व्यवसाय , उलाढाल , भांडवल गुंतवणूक , समभाग संख्या यावर त्याचप्रमाणे सारख्याच आकाराच्या दुसऱ्या कंपनी बरोबर तुलना करून कंपनी चांगली की वाईट हे ठरवता येणे शक्य आहे .
२.डायल्यूटेड EPS :हा इ पी एस काढताना करपश्यात नफ्यास एकूण शेअर्सचे संख्येने भागताना भविष्यात विविध कारणांनी वाढ होवू घातलेल्या शेअर्सची संख्या विचारात घेतलेली असते . रूपांतरणीय रोखे , वॉरंट , कर्मचाऱ्याना दिलेले स्टॉक ऑप्शन किंवा काहींना कंपनी नावारूपास आणण्याचे ऋण म्हणून दिलेले मोफत शेअर्स यांमुळे नजीकच्या काळात शेअर्सची संख्या वाढण्याची शक्यता असते यामुळेच डायल्यूटेड इ पी  एस हा नेहमीच्या इ पी एस  पेक्षा कमी असतो .(अपूर्ण)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Tuesday, 19 September 2017

गूगलचे तेझ अॅप

गूगलचे ऑनलाइन पेमेंटसाठीचे 'तेझ 'अॅप

 ऑनलाईन जगात अग्रस्थान पटकावणाऱ्या गूगलने पेमेंटच्या दुनियेत मोबाईलवरून पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी तेज (हिंदीतील तेझ हा शब्द,  जो ' वेग' या अर्थाने वापरला जातो) या नावाचे अॅप भारतीय बाजारात आणले आहे .18 सप्टेंबर 2017 रोजी या अॅपचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेठली यांनी एक छोटा व्यवहार करून केले .हे वॉलेट  नाही , नॅशनल क्लिअरींग कॉरपोरेशने UPI (Unified Payment Interface) ही प्रणाली एक वर्षापुर्वी विकसित केली होती . याच प्रणालीवर हे अॅप काम करीत असून गूगलने NCCI शी करार केला आहे .या व्यवहारांच्या सुरक्षिततेची दोघांनीही हमी घेतली आहे .यासाठी कोणतेही शुक्ल द्यावे लागणार नाही .UPI प्रमाणेच हे अॅप वापरायचे असून याच पेजवर ' यू पी आई एक पाऊल नव्या अर्थक्रांतीकडे ' या लेखात  तीचा वापर कसा करावा ते लिहले आहे . या अॅपचे साहाय्याने 24*7 पैसे पाठवणे , खात्यात रक्कम भरणे , बीले भरणे त्याच क्षणी शक्य आहे .
  यासाठी गूगल प्ले स्टोरवरून हे अॅप डावुनलोड करावे .आपल्या बँक खात्याशी केवळ एकदाच जोडून (Link) घ्यावे .यासाठी आपला मोबाईल नं या खात्याशी संलग्न असणे जरुरीचे आहे .हे करण्यासाठी बँक खाते क्रमांक आई एफ सी कोड द्यावा लागत नाही .त्यानंतर  हे अॅप गूगल पिन किंवा स्क्रीनलॉक देवून सेट करावे लागेल .यानंतर कॅशमोडचे मदतीने पैशांचे हस्तांतरण बँक तपशील न देता केवळ आभासी पत्त्यावर (Vrchual Address) करता येईल .याशिवाय या अॅपचे सहायाने क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या मदतीने पेमेंट करण्याचा पर्यायही  देण्यात आला आहे .हे अॅप अँड्रॉइड आणि आई ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असून इंग्रजीशिवाय हिंदी , मराठी , गुजराती , कन्नड , तामीळ , तेलगू आणि बंगाली भाषेत कार्यरत आहे .यामुळे पेटिएम मोबिक्विक यासारख्या वॉलेट समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे .
संदर्भासाठी UPI वरील लेखाची लिंक :https://m.facebook.com/story.php?story_fbid=393361947675363&id=393354804342744
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 15 September 2017

प्रि मार्केट ओपनिंग आणि पोस्ट क्लोजींग ..........

प्रिमार्केट ओपनिंग आणि पोस्ट क्लोसिंग

        भागबाजारा (Stock Market) मधे व्यवहार करताना आपण सर्वसाधारणपणे बाजारांच्या वेळेत आपला व्यवहार होइल असे सौदे (Orders) टाकतो . ह्या ऑर्डर्स आपण प्रचलित बाजारभावाप्रमाणे (Market Orders) किंवा विशिष्ट भावाने (Limit Orders) टाकतो हे आपल्याला माहीत आहेच .BSE /NSE सकाळी 09:15 ते दुपारी 03:30 या वेळात सुरू असते .ही वेळ बदलून वाढण्याची नजीकच्या काळात शक्यता आहे .सध्या या वेळेपूर्वी 15 मिनिटाचे प्रि ओपनीग सेशन असते , यामधे आणि बाजार बंद झाल्यावर 10 /20 मिनिटाच्या विश्रांतीनंतर,  20 मिनिटाचे पोस्ट क्लोजिंगसेशन असते .या मध्येही व्यवहार होवू शकतात .ते कसे यासंबंधीची माहिती करून घेवू या .
    बाजारात विविध गट कार्यरत असल्याने किंमतीत सतत फरक पडत असतो .हे भाव एका मर्यादेत रहावे  म्हणून बाजारात सर्कीट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर्सची यंत्रणा आहे .ती कशी चालते हे आपण मागील लेखात पाहिले .यात अकस्मात व खूप मोठा फरक पडला तरी बरीच पडझड होवू शकते .असे न होता समतोल किंमत मिळावी (equilibrium price) या प्रणालीचा खूपच उपयोग होतो . प्रिओपन सेशन मधे आपण व्यवहार करण्याचे ठरवलेल्या शेअरचा आजचा खुला भाव (Opening Price) काय असेल ते ठरवले जाते .या भावानेच पहिला व्यवहार केला जातो .हा भाव प्रि ओपनिंग सेशन मधे कसा ठरतो ते पाहूया .या सेशनची तीन भागात विभागणी केली आहे .
सकाळी  09:00 ते 09:08 या आठ मिनिटात यात भाग घेणाऱ्या सर्वाना आपल्या मार्केट किंवा लिमिट ऑर्डर टाकता येतात याच कालावधीत त्या दुरुस्त (Modify) करता येतात किंवा रद्द (Cancel) करता येतात .
यापुढील 4मिनिटात म्हणजे 09:08 ते 09:12 याकाळात कोणत्याही ऑर्डर टाकता येत नाहीत , बदलता येत नाहीत किंवा रद्दही करता येत नाहीत .या कालावधीत आजचा पहिला व्यवहार कोणत्या भावाने होइल ते ठरते .हा भाव ठरवण्याचे वेगवेगळे प्रमुख निकष आहेत .यामधे कालचा बंद भावाच्या (closing price) तुलनेत आज एका विशिष्ट किंमतीला असलेल्या समभागांच्या ऑर्डरची संख्या विक्रेते आणि खरेदीदार , या किंमतीला उपलब्ध समभागांची मागणी पुरवठा , या किंमतीला जुळणाऱ्या आणि न जुळणाऱ्या समभागांची संख्या यांचा विचार केला जातो .यामधे खालीलप्रमाणे कोणतीही एक प्रमुख शक्यता असू शकते .कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज कमी अथवा जास्त अश्या --
1. एका विशिष्ट भावाला बऱ्याच ऑर्डर पुऱ्या होत आहेत आणि फारच थोड्या ऑर्डर शिल्लक रहात आहेत .तर ती किंमत म्हणजे आजचा सुरुवातीचा भाव असे समजले जाते .
2.दोन विशिष्ट भावांना सारख्याच ऑर्डर्स पूर्ण होत असतील तर ज्या किंमतीच्या सर्वात कमी ऑर्डर शिल्लक राहतील तो भाव कमी /जास्त काहिही असेल तरी आजचा सुरुवातीचा भाव समजण्यात येईल .
3.दोन विशिष्ट भावाना सारख्याच ऑर्डर पूर्ण होतात आणि शिल्लक ऑर्डर्सही सारख्याच रहातात .अशा परिस्थितीत जो भाव बंद भावाचे जवळ आहे (कमी जास्त कोणताही) तो आजचा सुरुवातीचा भाव ठरेल .
4.दोन्ही विशिष्ट भावाना सारख्याच ऑर्डर पूर्ण होतात .शिल्लक ऑर्डर्स सारख्याच रहातात आणि दोन्ही भाव हे कालच्या बंद भावाचे वर खाली सारख्याच अंतरावरुन आहेत अशा परिस्थितीत कालचा बंद भाव हाच आजचा खुला भाव होतो .
5. या कालावधीत व्यवहार न झालेले समभाग जेव्हा पहिला व्यवहार जुळून येईल तेव्हा तो ज्या भावाने होइल तोच आजचा खुला भाव असेल .
  अशा तऱ्हेने मिळालेल्या समतोल किंमतीने (Equilibrium Price) ज्यानी ऑर्डर दिली आहे त्यांची व ज्यानी बाजारभावाप्रमाणे (Market Price) ऑर्डर टाकली आहे या सर्वांचे व्यवहार नोंदवले जावून मान्य केले जातात .
  यापुढील काळात म्हणजे 09:12 ते 09:15 हा काळात शिल्लक राहिलेला काळ हा प्रिमार्केट आणि नॉर्मल मार्केट यामधील संक्रमणाचा कालावधी (Buffer Period) असून याकाळात शिल्लक राहिलेल्या सर्व लिमिट ऑर्डर्स नियमित ट्रेडिंग सेशनकडे वर्ग होतात .तांत्रिकदृष्ट्या पहिल्या 8 मिनिटांतच या ऑर्डर्स स्वीकारल्या जात असल्याने हे व्यवहार फक्त 8 मिनिटेच होतात .
   बाजार दुपारी 03:30 ला बंद झाल्यावर नियमीत  हिशोब करण्यासाठी व्यवहार बंद होतात आणि 03:40 ला BSE आणि 03:50 ला NSE चे पोस्ट क्लोजींग सेशन चालू होते , ते 20 मिनीटे चालते यामधे खरेदीदार आणि विक्रेते यांना एक्सचेंजने  ठरवलेल्या दरानेच खरेदी /विक्री व्यवहार करता येतात .हा दर शेअर आणि डेरिव्हेटीवचे बाबतीत दुपारी 03:00 ते 03:30 या कालावधीतील सर्व व्यवहारांचा सरासरी भाव असतो .दर एक मिनिटांनी उलाढाल व सरासरी भाव नोंदवला जावून त्याची अंतिम सरासरी 30 मिनीटांनी काढली जाते . या वेळेत व्यवहार न झालेल्या शेअरचे बाबतीत शेवटचा व्यवहार ज्या भावास झाला तो भाव ही त्याचा बंद भाव असतो . रोजच्या रोज खरेदी करून विक्री करणारी किंवा विक्री करून नंतर खरेदी करणारे (Day Trader) यांना त्यांचे अपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याची संधी मिळते .त्याचबरोबर जर गुंतवणूकदाराना शेअरचा बंद भाव मान्य असेल तर त्याच दिवशी शेअर खरेदी करण्याची अधिकची संधी प्राप्त होते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 8 September 2017

बाजारातील गतिरोधक आणि थांबे

बाजारातील गतिरोधक आणि थांबे ...( Circuit filter/breaker)

  भागबाजारात , इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे समभागांचे भाव वर खाली होत असतात .एकाच वेळी अनेक हेतूने येथे गुंतवणूक केली जाते आणि कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा , असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो . सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वाप्रमाणे -- म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी  असेल तर भावात घट होते . भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार वरखाली होत असतो आणि तो कोणतीतरी एक दिशा पकडतो .
    समुहाची अशी मानसिकता होणे याची अनेक कारणे आहेत.यामध्ये एखाद्या व्यवसायात आलेली तेजी मंदी , सरकारी धोरण , कररचनेतील बदल , देशांतर्गत स्थिती , जगातीक स्थिती , नैसर्गिक आपत्ती , पावसाचा अंदाज , कंपनीच्या धोरणातील बदल ,कामगीरी , कंपनीविषयी पसरलेली अफवा इत्यादी अनेक कारणांमुळे लोकाना त्या कंपनीचे समभाग आपल्याकडे असावेत अथवा नसावेत असे अचानक वाटू शकते . तर बाजारातील काही घटक आपासातील संगनमताने कृत्रिमरीत्या खरेदी विक्री करून भावात मोठ्या प्रमाणात फरक पाडू शकतात .यामूळे छोट्या गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते असे होवू नये म्हणून सेबीने एका विशिष्ठ मर्यादेतच भाव रहावेत यासाठी गतीरोधक बसवले आहेत .यांना circuit filters असे  म्हणतात . सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाजार व्यवस्थापन कमिटी ही मर्यादा किती असावी ते ठरवते . या गतीरोधकामुळे किमान त्यादिवशी तरी आधीच्या बंद बाजारभावापेक्षा विहित मर्यादेतच वर खाली होतील .सध्या ही मर्यादा 2,5,10,20%असून  डेरिव्हेटीव करीता कोणतीही मर्यादा नाही या पाच प्रकारांत विभागली असून अपवादात्मक परिस्थिथित ती मधे बदल होवू शकतो .या मर्यादेत ऑर्डर टाकता येते , ज्यावेळी आपणांस संगणक पडद्यावर फक्त खरेदीदार अथवा फक्त विक्रेते दिसतात.तेव्हा त्याचा  उल्लेख अप्पर /लोअर सर्किट लागले आहे असा करण्यात येतो .
   या गतीरोधकाप्रमाणे काही थांबेही आहेत समभाग किंवा निर्देशांकात  (Share or Index) त्यात मर्यादेपलीकडे वटघट झाली तर हे थांबे (Circuit breker) कार्यान्वित होवून व्यवहार काही काळ किंवा त्या दिवसापुरते त्यातील सर्व व्यवहार थांबवले जातात .सध्या sensex आणि nifty तसेच काही निवडक समभाग यांना  10,15आणि 20% वट घटीवर असे थांबे बसवले आहेत . या मर्यादेच्या जवळपास कोणत्याही एका बाजारात (BSE/NSE) जर दुपारी 1 पर्यंत वटघट झाली तर 45 मिनिटे दोन्ही बाजारतील व्यवहार थांबवले जातात आणि 15 मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी (ज्यामध्ये एक निश्चित भाव मिळतो) देवून एक तास थांबवले जातात .जर परिस्थिती 1नंतर परंतू दुपारी 2:30 पर्यंत उद्भवली तर 15 मिनिटे व्यवहार थांबवून 15 मिनीटे प्री कॉल ऑक्शन साठी देवून अर्ध्या तासाकरिता थांबवले जातात आणि 2:30 आल्यास त्या दिवसापूरते यातील व्यवहार थांबवले जात नाहीत .जर अशी परिस्थिती बाजार चालू झाल्याझाल्याच उद्भवली आणि एकदा व्यवहार थांबवून व्यवहार पुन्हा सुरू झाले त्यानंतर 10% वट घट झाली तर व्यवहार थांबवले जात नाहीत मग दुपारी एक पर्यत 15% वट घट झाली तर 1तास 45मिनिटे व्यवहार थांबवून 15मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून दोन तास थांबवले जातात .दुपारी एक ते दोन मधे 15% वट घट झाली तर 45 मिनीटे थांबवून 15 मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून एक तास थांबवले जातात .जर दोन नंतर 15%वट घट झाली उरलेल्या पूर्ण वेळेसाठी थांबवले जातात .दिवसभरात कधीही 20% वट घट झाली तर उरलेल्या पूर्ण वेळेसाठी व्यवहार थांबवले जातात .
  सर्किट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर लागल्याने छोट्या गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान कमी होते . त्याचप्रमाणे जे खरेखुरे गुंतवणूकदार आहेत ते अचानक झालेली घट अथवा वाढ यामुळे गोंधळून जावू शकतात .त्यांना आपल्या गुंतवणूकीचे संदर्भात पुनर्विचार करून योग्य निर्णय घेण्याची संधी मिळते .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 1 September 2017

गुंतवणुकदारांचे प्रकार

                                                 गुंतवणूकदारांचे प्रकार

    भांडवलबाजारात विविध प्रकारे  गुंतवणूक करता येते हे आपणास माहीत आहेच किंबहुना आपली  गुंतवणुकही समभाग , रोखे , वस्तुबाजारातील वस्तू , यूनिट्स , ई टी एफ , इनव्हिट यासारख्या वित्तीय साधनांमधे विभागून करायला हवी असे सर्व गुंतवणूक तज्ञांचे  मत  आहे .आपली गुंतवणूक ही कायम आपल्या ध्येय्याकडे  नेणारी असली पाहिजे .आपण निश्चित केलेले वाजवी ध्येय्य , उपलब्ध भांडवल , जोखिम घेण्याची त्वरित निर्णय घेण्याची क्षमता यासारख्या अनेक गोष्टींवर ती अवलंबून आहे .येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा , गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो .बाजारात आपणास आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते . यातून शक्यता असलेल्या मोठ्या फायद्यामुळे यात असलेले धोके माहीत असूनही ते जाणीवपूर्वक स्वीकारले जातात . ज्याप्रमाणे आपणास व्यक्ति व्यक्ति मधे फरक जाणवतो जसे - एखादा धाडसी असतो तर दुसरा भित्रा , एखादा खूप उत्साही तर एखादा खूप सुस्त , एखादा बेधडक विश्वास ठेवणारा तर एखादा बारीक सारीक गोष्टींची अती चिकित्सा करणारा , एखादा खूप मेहनती तर एखादा पूर्णपणे दैववादी याशिवाय कोणी वेळ पाहून त्याप्रमाणे बदल करणारा अथवा न करणारा .
   भांडवलबाजारातही असे विविध  प्रकारचे गुंतवणूकदारांचे ढोबळ मानाने अनेक प्रकार आहेत त्यांतील काहींची ओळख करून घेवूयात --
 १.दीर्घ मुदतीची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार (Long Term Investor)- मूलभूत संशोधन (Fundamental Analysis) करून अशी गुंतवणूक केली जाते . गुंतवणूक जेवढी दीर्घ तेवढे नफ्याचे प्रमाण जास्त हे सिद्ध झालेले सर्वमान्य तत्व आहे . त्यामुळे बहुतेक गुंतवणूक सल्लागार अशी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात .हे गुंतवणूकदार ज्या कंपनीमधे गुंतवणुक करायची आहे त्याचे संस्थापक कोण ? संचालक मंडळावर कोण आहेत ? त्यांचे उत्पादन कोणते ? बाजारात त्याला मागणी काय भविष्यात बाजारपेठ कशी असेल ? नफा तोटा पत्रक , वार्षिक अहवाल त्यावरील लेखा परीक्षकांचे मत यासारखे बारीक सारिक तपशील विचारात घेतात . गुंतवणूक केल्यावर त्याचा आढावा घेतात आणि त्यांच्या अपेक्षित परिणामावर लक्ष ठेवतात आणि त्यावरून गुंतवणुकीचे काय करायचे तो निर्णय घेतात .असे लोक वर्षानुवर्षे गुंतवणुक करीत असल्याने त्यांना जास्त उतारा मिळण्याची शक्यता जास्त असते जर काही निर्णय चुकून नुकसान झाले तर त्याची भरपाई अन्य मार्गे होवू शकते .वर्षानुवर्ष विशिष्ट कंपनीत गुंतवणुक केल्याने त्यांचे गुंतवणूक मूल्य वसूल होते आणि गुंतवणूकीवर करमुक्त उतारा अधिक चांगल्या दराने मिळत असल्याने सहसा हे समभाग विकण्याचा ते विचार करीत नाही . एक वर्षावरील गुंतवणूकीतून झालेला कितीही फायदा हा करमुक्त असल्याने जरूर लागल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होवू शकते .
  २.अल्प मुदतीची गुंतवणुक करणारे गुंतवणूकदार (Short Term Investor) - आयकर कायद्याच्या दृष्टीने एक वर्षाच्या आतील गुंतवणूक ही अल्पमुदतीची समजली जावून विहित मर्यादा सोडून झालेल्या नफ्यावर 15% आयकर द्यावा लागतो . हे लोक विशिष्ट कालावधी साठी म्हणून गुंतवणूक करीत नाहीत ती कधी एक दिवसाची असू शकते तर कधी एक वर्षाची . भावात पडणाऱ्या फरकाचा ते फायदा करून घेतात. त्यामु़ळे त्याना तांत्रिकदृष्ट्या ट्रेडर म्हणता येणार नाही त्याना अपेक्षित भाव मिळाला कि ते गुंतवणुक मोकळी करतात . समभाग खरेदी केली , भाव वाढला  कि विकला पुन्हा नविन शोध घेवुन दुसरा समभाग घेतला , अशी चक्राकार खरेदी विक्री चालू असते हा शोध घेण्यासाठी सतत मेहनत करावी लागते .अनेक गुजराथी , मारवाडी आणि सिंधी कुटुंबातील व्यक्ति एक पूरक व्यवसाय म्हणून हा उद्योग करत असतात .
  ३.विक्रेते (Traders) - समभागाचा भाव आणि उलाढाल याचा आलेख मागील काळातील चढ उतार पाहून काही तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण करून काही  लोक गुंतवणूक करतात .ते या गोष्टी पाहून त्या आधारे केलेल्या गुंतवणूकीतून अल्प काळात अधिकाधिक नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात .हे लोक आलेखाच्या (charts) आधारे अंदाज बांधत असल्याने त्याना
चार्टिस्ट किंवा टेक्निकल एनालिस्ट असेही म्हटले जाते .
 ४.भविष्यकालीन (Derivetives) व्यवहार करणारे गुंतवणूकदार - हे व्यवहार मोठ्या रकमेचे आणि कमी कालावधीत होणारे आहेत .सतत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करून अल्प काळात मोठा नफा मिळवणे हे याचे उद्दिष्ट असते .भांडवल बाजारात होणारे 80% व्यवहार या सदरात मोडतात .काही धाडसी वैयक्तिक गुंतवणूकदार असे व्यवहार करीत असले तरी त्यांच्या गुंतवणूकीस आर्थिक मर्यादा येतात .संस्थात्मक गुंतवणुकदार मोठया प्रमाणावर असे व्यवहार करतात .याची दूसरी बाजू म्हणजे यातून होवू शकणारा प्रचंड तोटा .यामधे आपण गुंतवणूक केलेले भांडवल नष्ट होवून खिशातील अधिकचे पैसे देण्यास लागू शकतात .तेव्हा हे व्यवहार कसे होतात ते समजून न घेता करणे अत्यंत धोकादायक आहे .
  ५.डोळे मिटून (Blind Eyes) गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार - भांडवलबाजाराचा मोठ्या प्रमाणात विस्तार आणि विकास न होण्याचे असे गुंतवणूकदार हे महत्वाचे कारण आहे . हे गुंतवणूकदार कोणताही अभ्यास करीत नाहीत कोणी काही सांगावे आणि यांनी गुंतवणूक करावी .यातून फायदाही होवू शकतो परंतु कधीतरी ते सापळ्यात अडकतात आणि मग गुंतवणूक करून देण्याचे सोडून देतात आणि बाजाराच्या नावे खडे फोडतात . वास्तविक त्यांच्याकडे अधिक चांगल्या तऱ्हेने या गोष्टी समजण्याची पात्रता असते परंतू ते याकडे लक्ष देत नाहीत आणि आपली काय चूक झाली तेही सांगत नाहीत मांत्र लोकांच्या मनात भिती निर्माण होईल असे काहीतरी बरळत बसतात . असे लोक सोडून बाकी सर्व लोकांच्या डोळस गुंतवणूकीची भांडवल बाजारांच्या विकासासाठी आवश्यकता आहे .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Sunday, 27 August 2017

     एन आई एस एम (National lnstitute of Security Management
              उत्तरार्ध
NISM Certification Exams. चे काम दोन स्तरांवर चालते .एक म्हणजे नियमीत परीक्षा घेणे आणि दर तीन वर्षानी पुन्हा परीक्षा घेवून त्यात पास झालेल्या व्यक्तींची प्रमाणपत्र वैधता अजून तीन वर्षे वाढवणे किंवा जर त्या व्यक्ति भांडवल बाजारात कार्यरत असतील तर किमान सहा तास मुदतीची एक दिवसाची कार्यशाळा CPE (Continuing Professional Education) पूर्ण करून त्या कार्यशाळेअखेर घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होवूनही त्यांच्याकडील प्रमाणपत्राची वैधता आणखी तीन वर्ष वाढवता येवू शकते .हे दोन्ही मार्ग एकसमान आहेत .
    e-CPE म्यूचुअल फंड सल्लागार , वितरक यांच्या साठी सध्याच्या प्रमाणपत्राची मुदत वाढवण्यासाठी कार्यशाळा घेवुन निवडक ठिकाणी परीक्षा देवून प्रमाणपत्र मुदत तीन वर्षे वाढवता येवू शकते .
    NISM चा हा प्रमाणपत्र देणारा विभाग आणि इतर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा घेवून काही प्रमाणपत्र वितरित करण्यात येतात ती खालील प्रमाणे -
 1)NISM Moody's Certificate in Derivatives Strategies (Moody's ही आंतरराष्ट्रीय संस्था)
 2)Equity Trading &Investment (ICFL ही ICICI Direct ने स्थापन केलेली संस्था)
 3)Credit Rating & Research Analyst Certification
 4)Certified Alternative Investment Manager Certification
(यापैकी 3 आणि 4 हे अभ्यासक्रम Association of International Wealth Management of India ही आंतराष्ट्रीय प्रमाणपत्र वितरित करणारी संस्थेचे संयुक्त विद्यमाने)
D)School of Corporate Governance : भांडवलबाजारात कार्यरत कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा आणि अधिकाधिक गुंतवणूकदार भांडवल बाजारात येवून विकासाला चालना मिळावी यासाठी या विभागाकडून कंपन्यातील वरीष्ठ अधिकारी व संचालकमंडळातील सदस्यासाठी
विविध कार्यक्रम कार्यशाळा आयोजित केले जाते .
E)School for Regulatory studies & Supervision : बँकावर भारतीय रिझर्व बँकेचे आणि भांडवलबाजारावर सेबीचे नियंत्रण आहे या नियमकाना आपल्या ध्येय्यधोरणांची अमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची जरूरी लागते ही गरज पूर्ण करण्याचे काम या विभागाकडून केले जाते .रिझर्व बँक, सेबी , गुप्तवार्ता  , अर्थमंत्रालय ,अमलबजावणी विभाग ,प्रशासकीय सेवा ,महसूल विभाग यांच्या उच्चाधिकाऱ्यांसाठी ध्येय्य आणि धोरणे यांच्याशी सुसंगत असे प्रशिक्षणवर्ग आणि  कार्यशाळा आयोजित केले जातात .या वर्गात भांडवल बाजाराचे नियमन ,अवैध मार्गाने भांडवल बाजारात येणाऱ्या पैशाची समस्या ,आर्थिक धोरणांचे नियमन ,बाजारातील गैरव्यवहारांचा शोध ,भांडवल बाजारातील अकस्मात होणारी पडझड किंवा वाढ आणि त्यावरील उपाययोजना ,आर्थिक गुन्हेगारीची दखल तपास शोध कसा घ्यायचा यासंबंधीच्या प्रशिक्षणाचा सामावेश होतो .
F) School of Securities Information & Research : कोणत्याही क्षेत्रातील विकास हा त्यांतील मूलभूत संशोधनामुळे होतो .nism  चा हा विभाग या क्षेत्रातील जाणकारांना भांडवल बाजाराविषयी  संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून देतो .त्यांचे शोधनिबंध प्रकाशित करतो . विविध विषयावर संशोधन करून या विभागाने त्यासंबधीचे अहवाल अर्थमंत्रालय ,सेबी ,रिझर्व बँक यांना दिले आहेत .याशिवाय काही शोधनिबंध आंतरराष्ट्रीय मासिकात प्रसिद्ध झाले आहेत . येथे संशोधन करू ईच्छिणाऱ्या सर्वाना बाजाराशी संबंधीत हवी असलेली सर्व माहिती येथे उपलब्ध करून दिली जाते .
   NISM च्या 22 सर्टिफिकेशन कोर्सची सर्व माहिती यापुर्वीच्या भागात दिली आहे .भांडवल बाजारातील कार्यरत घटकांना सेबीचे नियमानुसार लागणारी ही  किमान पात्रता असली तरी एक जागृत गुंतवणूकदार म्हणून आपली गुंतवणूक ज्या विभागात असेल त्याची किमान माहिती आपल्याला असायलाच हवी . याशिवाय ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण वेळ उपलब्ध असलेले पी जी  कोर्स करायला हरकत नाही .या अभ्यासक्रमाना AICTE यांची मान्यता असून या विषयात करीयर करण्याची संधी आहे .शिक्षण आणि त्यावर होणारा खर्च यासाठी मराठी माणसांनी मागचा पुढचा विचार आजपर्यंत केला नाही सध्या दोन वर्षाच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमाचा खर्च साडेदहा लाख आहे .जो काहींना खूप जास्त वाटू शकतो . त्यांना शैक्षणिक कर्ज घेणे हा पर्याय होवू शकतो .अल्प मुदतीचे आणि सुटीतील अभ्यासक्रम हा ही पात्रता उंचावण्याचा पर्याय होवू शकतो .जे  चार हजार रुपयांपासून सुरू होतात .जर असे कोणी लोक आपल्या परीचयात असतील तर त्यांना यासंदर्भातील माहिती द्यावी . यातील सर्व माहिती NISM च्या अधिकृत www.nism.ac.in या संकेतस्थळावरून घेतली असून अधिक माहिती हवी असल्यास तेथे मिळेल .काही खाजगी व्यावसायिक शिक्षणसंस्था nism परीक्षांची तयारी करून घेतात परंतू त्यांची फी जास्त असते आणि त्याच्याबद्द्ल काही निश्चित अशी अधिक माहिती सांगणे योग्य ठरणार नाही .(समाप्त)

©उदय पिंगळे

 ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

Friday, 25 August 2017

एन आई एस एम (NISM) पूर्वार्ध

     एन आई एस एम (National lnstitute of Securities Management)
                   पूर्वार्ध
    NISM ही सेबीने (Securities &Exchange Board of India)
2006 साली स्थापना केलेली शैक्षणिक संस्था असून ती भारतीय सार्वजनीक विश्वस्त संस्था म्हणून नोंदली आहे .या संस्थेकडून भांडवलबाजारास आवश्यक शैक्षणिक अभ्यासक्रम , कार्यशाळा,कौशल्ये विकसित होण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात .सर्वसाधारण अर्थसाक्षरता वाढावी यासाठी अनेक शैक्षणिक सुविधा संस्थेकडे आहेत .संस्थेचे मुख्य कार्यालय वाशी नवी मुंबई येथे असून 72 एकर जागेवर पाताळगंगा (मुंबई पासून 65कि मी  अंतरावर नविन दृतगती मार्गानजीक) येथे सुसज्ज शैक्षणिक संकुल असून अलीकडेच ते सुरू झाले .ही संस्था पूर्णपणे स्वायत्त असून संस्थेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शनाने तीचे कामकाज चालते .संस्थेचे सहा शैक्षणिक विभाग खालीलप्रमाणे :
A)School for Securities Education : या विभागामार्फत पूर्ण वेळेचे भांडवल बाजाराशी संबधित खालील अभ्यासक्रम आहेत .
1)Post Graduate Diploma in Management (Securities Markets)
2)Post Graduate Program in Securities Markets
3)Post Graduation Diploma in Quntitative Finance
खालील अभ्यासक्रम अर्धवेळ आहेत
1)Post Graduate Diploma in Data Science
2)Certificate in Securities Law
3)Certificate in Treasury Management
4)Post Graduation Diploma in Financial Engineering & Risk  Management
अल्प मुदतीचे अभ्यासक्रम
1)Summer School 2017
2)Post Graduate Certificate in Securities Market
3)Post Graduate Certificate in Capital Market
4)NISM Certified Course in Securities Market
5)NISM- VES lnvestment Adviser Program
6)NISM IMART Certificate Course in Securities Market
B)School for Investor Education & Financial Literary :या विभागामार्फत अर्थसाक्षरता वाढीस लागावी यासाठी
1)शाळांमधे आर्थिक विषयाचे शैक्षणिक उपक्रम
2)अर्थसाक्षरतेचे विषयी ncfeindia.org ह्या स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती ,वेळोवेळी त्याचे नूतनीकरण .
3)विविध शहरे ,गावे यामधुन अर्थ साक्षरता विषयक कार्यशाळा
C)School of Certification of Intermediate :भांडवल बाजाराशी संबधित सर्व घटकांना आपल्या कामासंबंधी प्राथमिक गोष्टींची किमान माहिती होण्यासाठी सेबीच्या नियमानुसार आवश्यक अशी पात्रता पूर्ण करण्यासाठी या परीक्षा देणे जरुरीचे आहे .या परीक्षा देण्यासाठी वय आणि शिक्षण याबाबत कोणतीही अट नसून पर्यायी स्वरूपात उत्तरे देणे अपेक्षित असते .प्रश्न आणि पर्याय
समजेल एवढे ज्ञान आणि उत्तर निवडता करता येईल इतके संगणकज्ञान असणे जरुरीचे आहे .या परीक्षा ऑनलाइन होतात आणि ताबडतोब निकाल मिळतो .प्रथम नोंदणी करून अभ्यासक्रम निवडावा लागतो . नोंदणीसाठी आधार क्रमांकाची गरज असते . अभ्यासक्रम नोंदवल्यावर स्वयं अध्ययनासाठी लागणारे साहित्य ऑनलाइन मिळते परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 50/60%  गुण मिळवणे जरुरीचे असून त्याची वैधता 3 वर्ष असते परीक्षांचे माध्यम इंग्रजी असून काही परीक्षा हिंदी / गुजराथी माध्यमातुनही देता येतात .पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण  न  झाल्यास परीक्षा फी  भरून अजून दोनदा परीक्षा  देता  येते . भांडवलबाजाराचे संबधित कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी किमान एवढी पात्रता परिपूर्ण करावीच लागते .भरलेल्या  फीमध्ये एक सराव परीक्षाही  देता  येते .नोंदणी केल्यापासून 180 दिवसाचे आत देशभरातील 150 हून अधिक ठिकाणी असणाऱ्या कोणत्याही केंद्राची निवड करून परीक्षा देता येते . दोन तास (Common Derivatives Certification   तीन तास 150प्रश्न 150 गुण ) चालणारी ही परीक्षा 50/100 बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात असून योग्य उत्तर निवडायचे असते . काही परीक्षामधे चुकीच्या उत्तराकरीता 25% गुणकपात होते .या अभ्यासक्रमाची फी ₹ 1000 ते 3000 या दरम्यान आहे .माफक फी मुळे कोणीही गुंतवणूकदार या परीक्षा देवून व्यवसाय आणि नोकरीच्या किमान पात्रता धारण करू शकतो . तर सध्या भांडवल बाजारात कार्यरत व्यक्ति त्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाने अधिक उच्च दर्जाची सेवा देवू शकते .या शिवाय एक सुजाण गुंतवणूकदार बनून या  ज्ञानाचा स्वतःच्या गुंतवणूकीचे निर्णय घेण्यास उपयोग होतो यामुळे शक्य असेल त्या सर्वानीच ते गुंतवणुक करीत असलेल्या गोष्टीशी संबधित  परीक्षा देणे म्हणजे ज्ञानात केलेली गुंतवणुक आहे असे म्हणता येईल .सध्या उपलब्ध असलेले बावीस प्रमाणपत्र अभ्यासक्रम खालील प्रमाणे :---
 1)NISM Series 1:Currency Derivatives Certification Exams
 2)NISM Series 2A: Registrar & Transfer Agent (Corporate) Certification Exams
 3)NISM Series 2B: Registrar &Transfer Agent (Mutual Fund) Certification Exams
 4)NISM Series 3A: Securities lntermediaries Compliance (Non Fund) Certification Exams
 5)NISM Series 3B: lssuers Compliance Certification Exams *
 6)NISM Series 4: Interest Rates Derivatives Certification Exams
 7)NISM Series 5A: Mutual Fund Distributors Certification Exams
 8)NISM Series 5B: Mutual  Fund Foundation Exams.
 9)NISM Series 5C: Mutual Fund Distributors (Leval-2) Certification Exams.*
10)NISM Series 6: Depositary Operatons Certification Exams.
11)NISM Series 7: Securities Operations & Risk Management Certification Exams.
12)NISM Series 8: Equity Derivatives Certification Exams.
13) NISM Series 9: Merchant Banking Certification Exams.
14)NISM Series 10A: Investment Adviser (Leval -1) Certification Exams.
15)NISM Series 10B: Investment Adviser (Level -2) Certifiation Exams.
16)NISM Series 11: Equity Sells Certification Exams.*
17)NISM Series 12: Securities Market Foundation Exams.*
18)NISM Series 13: Common Derivatives Certification Exams.
19)NISM Series 14:    Internal Auditors for Stock Brokers Certification Exams.*
20)NISM Series 15: Reserch Analist Certification Exams.
21)NISM Series 17:
Retirement Advicers Certification Exams.
22)IBBI Limited Insolvency Certification Exams.
*अशी खूण असलेले अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत अशी सेबीची सक्ती नाही .हे अभ्यासक्रम सामान्य ज्ञान वाढावे यासाठी सर्वांसाठी असून ते प्रामुख्याने विद्यार्थी ,शिक्षक ,गृहिणी यांना उपयुक्त आहेत .(उत्तरार्ध उद्या प्रसारित केला जाईल. अधिक माहितीसाठी : www.nism.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी)

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


   

Friday, 18 August 2017

भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ....भाग ३

      भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ..........(भाग -३)

(मागील लेखावरून पुढे )
11)संशोधन संस्था (Research Company): या कंपन्या डेटा बँकेने जमवलेली माहिती तयार केलेले अहवाल यावरून जोखिम(Risk) व परतावा (Return)याचा अंदाज बांधून आपला अहवाल देतो .पूर्वीचे जे अंदाज चुकीचे ठरले त्याचा चिकित्सक विचार करतो .हे काम अत्यंत बुद्धिमत्तेचे असून असे कार्य करणाऱ्या संशोधकास सुसज्ज कार्यालय असून अनेक आधुनिक सोईसुविधा उपलब्ध असतात . आर्थिक ,मूलभूत व तांत्रिक अशा सर्व प्रकारचा अभ्यास करून देशातील स्थिति आणि जागतिक परिस्थिती यांचा विचार करून या तिन्ही प्रकारचे अहवाल संशोधकांकडून प्रकाशित केले जातात .जगभरात सर्वत्र त्याची दखल घेतली जाते .आर्थिक विषयाची पदव्युत्तर पदवी किंवा डॉक्टरेट आणि 10 वर्षाचा अनुभव संशोधकास आवश्यक आहे .
12)मध्यस्थ (Arbitrager): शेअर बाजारांच्या संदर्भात मध्यस्थ हा एकमेव व्यवसाय आहे ज्यासाठी केवळ ज्ञान हेच भांडवल लागते आणि या व्यवसायात तोटा होत नाही .विशिष्ट कंपनीच्या दोन बाजारातील बाजारभावातील तफावत दूर करण्याचे काम हा मध्यस्थ करीत असतो समभाग व डेरीव्हेटिव्हमधील आर्बिट्राजर हा असा व्यवसाय आहे येथे कायम नफाच आहे जोखिम न स्वीकारता केला जाणारा असा हा अपवादात्मक व्यवसाय असून येथे कौशल्याप्रमाणे अधिकाधिक नफा कमवण्याची हमी आहे . बाजारातील तेजी अथवा मंदीकडे ध्यान न देता आर्बिट्राजरला फक्त तफावत शोधून आपल्याकडे घ्यायची असते .बाजारातील व्यवहारांचे पूर्ण ज्ञान ,संगणकावर जलदगतीने मागणी टाकण्याचे आणि असलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे तंत्र जमणे आवश्यक आहे .अनेक दलाल , मोठे गुंतवणूकदार आणि संस्था यांनी आपले आर्बिट्राजर नेमले असून त्यांचे भांडवल आणि आर्बिट्राजरचे कौशल्य असे असल्यास नफ्यातील काही टक्के हिस्सा आर्बिट्राजरला मिळतो . NISM कडील डेरिव्हेटीव्हजचे किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे जरूरी आहे .
13)डेरिव्हेटिव्हज (Derivetives): मुंबई शेअर बाजारात यापूर्वी असलेल्या वायदा कराराची 'बदला'(हे या व्यवहाराचे नाव आहे.त्याचा हिंदी चित्रपटातील बदल्याशी काही संबध नाही) ही पद्धती ती बदलून नवीन फ्युचर आणि ऑप्शन या माध्यमातून भविष्यकालीन सौदे सुरू झाले .हे सौदे मूळ किंमतीला आधारभूत धरून केले जातात यामुळे काही अंशी बाजारातील चढ उतारावर ताबा रहातो .हे व्यवहार समभाग ,वस्तू ,चलन आणि अन्य मालमत्तेत केले जावू शकतात . ज्यावेळी मोठ्या वित्तीय संस्था व सहभागिदार मोठ्या प्रमाणात याद्वारे व्यवहार करू लागले तेव्हा जोखिम व्यवस्थापन नीट व्हावे म्हणून हेजिंग करण्यासाठी याचा वापर होऊ लागला .फ्यूचरमधे भविष्यकाळातील जोखिम स्वीकारलेली असते ऑप्शनमधे अधिमुल्य (Premium)देवून ती मर्यादीत केली जाते .म्यूचुअल फंड ,विदेशी वित्तसंस्था ,देशी वित्तसंस्था,मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार आणि काही धाडसी लोक मोठया प्रमाणात हे व्यवहार करत असतात. यापैकी म्यूचुअल व विदेशी वित्तसंस्था यांना फक्त हेजिंगसाठी असे  व्यवहार करण्यास परवानगी आहे. बाजारातील एकूण व्यवहारांच्या 80% हून अधिक व्यवहार डेरिव्हेटीव्हज मधे होत असल्याने यामधील तज्ञ व्यक्तिंना संधी आहे NISM कडून समभाग (Equity) वस्तू (Commodity) परकीय चलन (Forex) यातील वेगवेगळे तसेच सर्वांचे संयुक्त प्रमाणपत्र असलेले त्याचप्रमाणे  BSE /NSE यांचे डेरिव्हेटीव्हजवरील प्रमाणपत्र मिळवणे आणि अनुभव घेवून यामधे प्राविण्य मिळवणे जरूरी आहे.यातील एक व्यवहार हा किमान पाच लाखहून रुपयांहून अधिक मूल्यांचा असल्याने, यामधे नफा अधिक असला तरी भांडवल पूर्णपणे गमावून स्वतः कडील काही पैसे भरावे लागण्याचा मोठा धोकाही आहे .या करारामधे अनेक गुंतागुंतीच्या मुद्यांवर एकत्रित विचार केला जात असतो ,तेव्हा हे व्यवहार कसे होतात ते माहिती करून घेणे आणि प्राविण्य मिळवण्यासाठी जाणकारांकडे उमेदवारी करणे हे मार्ग आहेत .या व्यवहारांना एक्चेंजची हमी असल्याने व्यक्तिव्यक्तिंमध्दे होणाऱ्या भविष्यकालीन सौद्यांपेक्षा हे करार वेगळे आहेत .
14)आर्थिक गुन्हे (Crimes ) अन्वेषक : आर्थिक क्षेत्रात सुरळीत व्यवहार होण्यास नियम आहेत . अनेक लोकांनी सखोल विचार करून ते बनवले आहेत .परंतु गुन्हेगार यांपेक्षा हुशार असून त्यांना शोधून काढून शिक्षा देण्यास मदत करणे हे त्याहून बुद्धिमत्तेचे काम आहे .या क्षेत्रातील व्यवहार तज्ञ ,कायदेशीर ज्ञान असलेले आणि गुन्हेगारांच्या मानसिकतेचा विचार करू शकणारे या सर्वाना येथे संधी असून अशा व्यक्तिंची संस्था ,सरकारी यंत्रणा , सेबी यांना अशा लोकांची नियमीत मदत होवू शकते .हे काम कंत्राटी पद्धतीने चालत असून त्याचे स्वरुप व व्यापकतेप्रमाणे उच्च मोबदला मिळू शकतो .
15)आर्थिक नियोजक (Financial Planners): नियोजनास पर्याय नाही .आर्थिक नियोजक हा फी आकारुन उपलब्ध निधीचा उद्दिष्टानुसार कसा वापरता येईल ,त्याचे अंदाज पत्रक कसे असावे ,जोखिम व्यवस्थापन ,कर मार्गदर्शन , मालमत्तेचे नियोजन ,निवृत्तीनंतरचे नियोजन याविषयीच्या व्यक्तीगत गरजा लक्षात घेवून मार्गदर्शन करतो हा व्यवसाय वेतनासह /शिवाय अथवा कमीशन घेवून करता येवू शकतो .
समारोप : ही यादी परिपूर्ण नाही याशिवाय भागबाजारशी संबंधी अनेक व्यवसाय आहेत . उदा . प्राथमिक बाजार ,दुय्यम बाजारासंबधी कामे ,बाजार सुरू व बाजार बंद झाल्यावर करायची कामे ,अकाउंटीग ,तपासणी , विविध प्रसारमाध्यमे ,पत्रकारिता विविध कार्यक्रमाचे आयोजन , मुलाखती , स्थानिक व जागतीक बाजारातून निधी गोळा करणे , कार्यालयीन प्रशासन यासंबंधी अनेक व्यवसाय संधी आहेत .या संधींचे सोने करण्यासाठी नोंदणी आणि किमान पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे . यातील कोणतेही काम दुय्यम नाही ,यांच्यातील सुसंवादाने बाजार सुरळीत चालतो .यातील अनुभव घेवून महत्वाकांक्षी लोकांना यासंबंधीच्या व्यवसायसंधी जगभर उपलब्ध आहेत कारण थोड्याफार फरकाने जगभरात याच पद्धतीने सर्व व्यवहार चालतात .  तेथे कंपनीचे नाव आणि चलन वेगळे असते एवढाच काय तो फरक . मागील तीन लेखातून काही व्यवसायांची ओझराती ओळख करून घेत असताना लेखन खूप लांबत चालले आहे . तरीही थोडक्यात जास्तीत जास्त परिपूर्ण माहिती आपल्याकडे पोहोचवण्याचा हा प्रयत्न .यातून कुणाला प्रेरणा मिळू शकली तर अधिक आनंद होईल . तेव्हा इथेच क्षणभर थांबूया .(समाप्त)

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे ,त्यास जरूर प्रतिसाद द्या .


Sunday, 13 August 2017

वस्तूबाजारातून हीरा खरेदी .....😀



 ...वस्तूबाजारातून हीरा खरेदी ...

   हीरा हा एक मौल्यवान आणि सामन्यांच्या आवाक्यात न येणारा धातु /रत्न आहे असे अनेकांना वाटते . त्यांच्या संकल्पना बदलून टाकणाऱ्या काही कल्पक योजना घेवून येण्यास ,इंडियन कमोडिटी एक्चेंज (ICEX) तयार आहे . सेबी या भांडवलबाजार नियामकाकडून (Securities &Exchange Board of India ) नुकतीच त्यांच्या हीरा खरेदी एस ई पी  ला मंजूरी मिळाली आहे .त्यामुळे आता हीरा खरेदी /विक्री करणे सोपे झाले आहे. किमान 1 सेंट हीऱ्याच्या किंमती एवढी रक्कम (अंदाजे ₹900/-)आपण दरमहा गुंतवून (एस आई पी)30 सेंट 50सेंट आणि 100 सेंट या तीन प्रकारात आपण हीरा खरेदी करू शकणार आहोत . lCEX चा सदस्य असलेल्या दलालाकडे आपल्या ग्राहक ओळखी KYC ची पूर्तता करून एक खाते काढावे लागेल .जर आपल्या दलालांनी ही सेवा आपणास देवू केली असेल तर त्याच्यामार्फत हे व्यवहार आपण करू शकतो .काही तांत्रिक कारणाने आपले समभाग , रोखे , यूनिट असलेले निक्षेपीकेकडील सध्याचे खाते ( D -mat account) आपणास या व्यवहारात वापरता येत नसल्याने जास्तीचे एक डी मॅट खाते काढावे लागेल .हे व्यवहार पुढील महिन्यात नियमित सुरू होतील ,यासंबंधी प्रयोग तत्वावर काही चाचणी व्यवहार (MockTrading) ICEX वर होत आहेत .या बाजारात घेतलेला हीरा हा अमूर्त (Electronic) पद्धतीने खरेदी करता येत असल्याने 1 सेंटहून कमी /अधिक खरेदी करता येवू शकेल .मांत्र जर तो वस्तूरूपात (Physical Form) हवा असेल तर किमान 30 सेंट आपण खरेदी केलेले असले पाहिजेत . दरमहा एक सेंटचे पटीत SIP करून नंतर मूर्त स्वरूपात हीऱ्याचा ताबा घेता येईल .अशा प्रकारची हीरा खरेदीची जगातील ही पहिलीच व एकमेव योजना आहे .येथे फक्त नैसर्गिकरीत्या उपलब्ध झालेल्या हीऱ्यांची खरेदी विक्री होईल त्यास जगप्रसिद्ध हीरा उत्पादक व विक्रेते De Beers ने 4C (Cut -पैलू ,Carat - वजन , Colour - रंग ,Clarity - पारदर्शी) ने प्रमाणित केलेले असेल  MALCA याजगप्रसिद्ध हीरे कुरियर सेवेने त्याची पोच खरेदीदारास केली जाईल . बाजारात लोकांच्या मागणीनुसार भाव बदलत रहातील आणि आंतरराष्ट्रीय भावाचे आसपास कालांतराने स्थिरावतील  ,पुरेशी पारदर्शकता या व्यवहाराना मिळेल . यामुळे दर्जेदार ,प्रमाणित हीरा खरेदी करणे सर्वसामान्यांना शक्य होणार आहे .भावात पडणाऱ्या फरकाचा लाभही  (Trading)करून घेता येणेही शक्य आहे. सोने , चांदी , हीरे यातून मागील काही वर्षात मिळालेला उतारा हा अपवादात्मक परिस्थिती वगळता आकर्षक नाही. तरीही मोठ्या प्रमाणात हौशी आणि गुंतवणूकदार जगभर यात व्यवहार करीत असतात त्यामुळेच  यातील भावनात्मक मुल्याची तुलना करता येणे अशक्य आहे .

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .


Friday, 11 August 2017

भांडवलबाजार शिक्षण आणि व्यवसायसंधी ....(भाग -२)

      भांडवलबाजार शिक्षण आणि
व्यवसायसंधी ......(भाग --२)

(मागील लेखावरून पुढे)
5)निक्षेपक /निक्षेपिका (Depositary &Depositary Participant ):ही सुविधा म्हणजे 21 व्या शतकातील गुंतवणूकदारांना मिळालेले वरदान आहे .यामूळे तांत्रिकदृष्ट्या कोणतीही गुंतवणूक कागद विरहित करणे शक्य झाले आहे . समभाग बाजारात याची टप्प्याटप्प्यांत आणि सक्तीने अमंलबजावणी झाल्याने व्यवहार सहज, सुलभ , सोपे,जलद आणि पारदर्शक झाले आहेत . गुंतवणूकदारास अत्यंल्प गुंतवणूक करणे यामुळे शक्य झाले असून ह्या अतिशय सोप्या वाटणाऱ्या पद्धतीत प्रवेश ,नोंदी , हिशोब , ऑडीट ,करविषयक माहिती , नेटवर्क , डी पी नेटवर्क , डी पी नूतनीकरण , आर्बिटरेशन , बॅकप ,पर्याय यंत्रणा अशा अनेक विभागांचा सामावेश होतो .यामधे सी ए , अकौंटंट , वकील, इंजीनियर ,संगणक तज्ञ नेटवर्कतज्ञ ,पत्रकार याशिवाय संगणकाची अगदी जुजबी ओळख असलेल्या सर्वाना संधी आहे या पद्धतीचे महत्व सर्वाना पटल्याने समभागाशिवाय रोखे ,यूनिट ,ई टी एफ ,बचत योजना पत्रे ,विमा प्रमाणपत्रे कमर्शियल पेपर , सर्टिफिकेट ऑफ डेपॉजिट आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिली घेतली जात आहेत .येथे काम पडणाऱ्या
प्रत्येकास डेपोसिटरी ऑपरेशन , रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेशन पूर्ण करणे या किमान पात्रता आहेत , व्यक्तीगतरित्या डिपोसिटरी पार्टिसिपंट म्हणून काम करणे हा व्यवसाय होवू शकतो तर त्यांच्याकडे आपल्या क्षमतेनुसार नोकरी करणे हा एक पर्याय होवू शकतो .
 6)मूलभूत विश्लेषक (Fundmental Anyalist): बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्याने स्पर्धात्मक युगात आधिकाधीक गुंतवणुकदार आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी विशिष्ट रितीने अभ्यास करून त्यातून काढलेले निष्कर्श जर बरोबर आले तर मोठ्या प्रमाणात व्यवसायसंधी वाढतात हे येथील दलाल ,बँका , अर्थसंस्था ,बँकेतर वित्तीय संस्था , एसेट मॅनेजमेंट संस्था या भागबाजारांच्या घटकांना माहीत झाले आहे .सी ए ,सी एस , एम बी ए (फायनान्स/अकौंटसी) असे शिक्षण घेतलेले असलेल्या व बाजारात करीयर करू इच्छिणाऱ्या सर्वाना मूलभूत विश्लेषक होण्याची संधी आहे मुंबई शेअर बाजाराने या संबंधिचा एक अभ्यासक्रम विकसित केला आहे .उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून कोणत्याही कंपनीचे आंतरिक मूल्य शोधून काढणे ही एक कला आहे यानाच रिसर्च /सिक्युरिटी फायनांस एनालिस्ट असेही म्हणतात .यांचे काम शास्त्रावर आधारित आहे जोखिम /परतावा यांची चक्रवाढ पद्धतीने पृथकरण करून पैशाचे वर्तमान काळातील मूल्य व भविष्य मूल्य याचा विचार केलेला असतो यामूळे गुंतवणूकदाराची जोखिम कमी होते .Du pont या कंपनीने विकसित केलेल्या SWOT पद्धतींनी कंपनीचे बलस्थान , त्रुटी ,उपलब्ध संधी,संभावित धोके (Strength,Weekness ,Opportunity ,Threat) यामूळे गुंतवणूकीवरील परतावा (ROE : Return on Equity) काढणे सोपे झाले आहे . यामूळे अपेक्षित जोखिम व परतावा याबाबत अचूक अंदाज बांधणे सोपे होते .नेमके काय आणि कसे करायचे ,उपलब्ध आकडेवारी काय सूचवते यावरून अर्थबोधन करण्याची क्षमता असणे गरजेचे आहे .अनेक कंपन्या , बँका ,वित्तसंस्था ,एसेट मॅनेजमेंट कंपन्या ,दलाल यांच्याकडे उच्च वेतनमानाने सुरू होणाऱ्या नोकऱ्याची संधी आहे .याशिवाय फी आकारुन अशा प्रकारे स्वतंत्र व्यवसाय करता येणॆ शक्य आहे . nism कडून किंवा समकक्ष प्रमाणपत्र व सेबीकडे नोंदणी आवश्यक .
7) तांत्रिक विश्लेषक :(Technical Annyaalist) तांत्रिक बिश्लेषण  हे मूलभूत विश्लेषणापेक्षा वेगळे असून मूलभूत विश्लेषक असा विचार करतात की बाजार हा जास्तीत जास्त तर्कावर तर काही प्रमाणात मानसिकतेवर आधारित आहे तर तांत्रिक विश्लेषकांच्या मते तो जास्तीत जास्त मानसिकतेवर आणि काही प्रमाणात तर्कावर आधारित आहे .त्यामुळे तांत्रिक विश्लेषकांचा भर हा शेअरबाजारातील स्थित्यंतरावर असतो यासाठी रेखाचित्रे आलेख यांचा अभ्यास केला जात असल्याने चार्टिस्ट असेही म्हणतात. पूर्वीचे वर्तन पायाभूत समजून भविष्यातील वर्तनाचा त्यांच्याकडून वेध घेतला जातो मोठ्या प्रमाणात खरेदीविक्री करणाऱ्या संस्था काही समभाग दीर्घ मुदतीसाठी तर काही अल्प मुदतीसाठी घेतात यातील अल्प मुदत आणि डे ट्रेडिंगसाठी तांत्रिक विश्लेषकाना उच्च वेतनाच्या नोकरीची संधी आहेत .तांत्रिक विश्लेषण आपण टाळू शकत नाही कारण भावात होणारी वट घट ही त्यामागील समूहांच्या एकत्रित मानसिकतेमुळे होते हे सर्वमान्य आहे .जे लोक नफा आणि नुकसान लीलया पचवू शकतात त्यांचे हे आधारस्तंभ आहेत .फी आकारणी करून हा स्वतंत्र व्यवसायही होवू शकतो .nism कडून याचा प्राथमिक आणि प्रगत असा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि सेबीकडे नोंदणी करणे आवश्यक आहे .
8)फंड व्यवस्थापक ( fund manager)शेअर बाजारात भारतीय आणि विदेशी वित्तसंस्था मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणुक ज्या ऊद्धेशाने केली जाते .त्या प्रमाणे करणे करून देणे ,वेळोवेळी त्याचा आढावा घेणे ,कालानुरुप यात बदल करणे हे फंड व्यवस्थापकाचे  काम आहे .तज्ञांच्या मोठ्या गटाचे तो नेतृत्व तो करीत असतो आणि अंतिम निर्णय घेवून एक पायंडा (Benchmark)पाडत असतो या कामाची व्याप्ती पोर्टफोलिओ मेनेजरहून जास्त असून फायनान्समध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना नामवंत फंड मेनेजरचे सहायक म्हणून सुरुवात करून साधारण तीन वर्षाच्या अनुभवाने स्वतंत्र व्यवसाय अथवा नोकरीच्या संधी आहेत .
9)संपत्ती व्यवस्थापक (Assets Manager): म्यूचुअल फंड ,समभाग संलग्न विमा योजना ,पेन्शन फंड हे गुंतवणूकदाराचे वतीने बाजारात गुंतवणूक करीत असतात ही गुंतवणूक करण्यासाठी विश्वस्त संस्था स्थापन करावी लागते ते विविध योजना बाजारात आणतात .अशा योजना आखणे , सेबीची परवानगी घेणे ,प्रारंभिक विक्री करून जमा रकमेची योजना उद्देशानुसार कार्यान्वित करणे , कायदेशीर तरतुदीप्रमाणे nav जाहीर करणे विविध अहवाल तयार करणे ,तक्रार निवारण यंत्रणा उभी करणे ,खर्च कमीशन यांची माहिती देणे या सारखी कामे वेळेत आणि तत्परतेने करणे जरुरीचे असते अतिशय जोखमीचे काम असल्याने उच्च शैक्षणिक पात्रता आणि काही वर्षाचा सहाय्यक व्यवस्थापकाचा अनुभव असणे गरजेचे आहे .हे फार जबाबदारीचे काम असल्याने त्याचे वेतनमान साजेसे आणि उच्च असते .
10)माहिती संकलन (Deta Bank) : शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या सर्वांची मार्गदर्शनाची गरज डेटा बँक आणि रिसर्च कंपनीद्वारे पूर्ण होऊ शकते . उपलब्ध आकडेवारीच्या सहायाने संशोधनात्मक अहवाल तयार करणे हे जिकिरीचे काम आहे . कोणताही निर्णय घेण्यापुर्वी त्याचा इतिहास पहाणे गरजेचे असते . शेअर बाजार सतत भविष्याचा वेध घेत असेल तर या क्षेत्राची भूतकाळातील कामगिरी ही पथदर्शक ठरते उदाहरणार्थ अन्य कोणत्याही गुंतवणूक प्रकारपेक्षा समभाग गुंतवणूक ही जास्त फायदेशीर आहे हे सांगणे संकलित केलेली माहिती आणि त्याद्वारे काढलेला निष्कर्ष यामूळे सहज समजू शकते .ही सर्व माहिती गोळा करणे त्याची नोंद ठेवणे आणि त्यातून अनुमान काढणे यासाठी अचुकतेने काम करणाऱ्या व्यक्तीची गरज लागते .ही आकडेवारी अहवाल मोबदला घेवुन व्यक्ति आणि संस्था यांना पुरवले जातात एका अर्थी गुंतवणूकीचा डेटा बँक हा कच्चा माल आहे .हे काम पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करता येवू शकते कामाचे निश्चित स्वरूप आणि आवाका यावर डेटा कंपनीचा मोबदला अवलंबून असतो .ठोक स्वरूपात हे काम स्विकारले तर घरी बसूनही करता येवू शकते .यासाठी संगणकावर वेगाने व अचुकतेने काम करण्याचा सराव असणे जरुरीचे आहे .(अपूर्ण)

©उदय पिंगळे

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख आणि यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर आहे .