Friday, 17 November 2017

कंपन्यांचे वर्गिकरण ...

                                         कंपन्यांचे वर्गिकरण

   शेअरबाजारात नोंदवण्यात आलेल्या कंपन्याचे बाजारमूल्य (Market Capital) आणि त्यातील शेअर्सची दैनंदिन उलाढाल (Daily Trading Volume) यावरून सध्या कंपन्यांची विभागणी तीन प्रमुख गटात करण्यात आली आहे .१.मोठ्या कंपन्या (Largecap) २.मध्यम कंपन्या (Midcap)आणि ३.लहान कंपन्या (Small can).स्टॉक एक्सचेंजची गव्हर्नीग कमिटी ठराविक कालावधी नंतर प्रत्येक कंपनीचे सरासरी बाजारमूल्य आणि सरासरी दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून वरीलपैकी कोणत्या गटात कोणती कंपनी असावी या संबंधात निर्णय घेत असते . अलीकडे या पद्धतीत सेबीने बदल सुचवला असून तो पुढील वर्षात अमलात येईल .त्यानुसार आता बाजारमूल्यानूसार पहिल्या 100 कंपन्या या मोठ्या 101 ते 250 पर्यंत मध्यम आणि बाकी सर्व लहान कंपन्या  समजण्यात येतील .असे करीत असताना कंपन्यांची दैनंदिन उलाढाल विचारात घेतली जाणार नाही .
    मोठ्या कंपन्यामधे केलेली गुंतवणूक तुलनेने सुरक्षित असल्याने सर्व गुंतवणूकदारांची पहिली पसंती त्यांना असते .या कंपन्या सुरक्षित असून यांचे भाव अचानक मोठ्या प्रमाणात वाढत नाही किंवा कमी होत नाहीत . कंपनीची उलाढाल , नफा , डीवीडेंड , बोनस यावरून त्यात फरक पडतो . साधारण 20% वेगाने त्या वाढत असतात अथवा कमीही  होतात .मांत्र मोठ्या प्रमाणात  अशा कंपनीत गुंतवणूक केली म्हणजे 100%  सुरक्षित झाली असे समजू नये  .
    या कंपन्यांच्या तुलनेत मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरचे बाजार भावात लार्ज कॅप कंपन्यांच्या तुलनेत भावातील फरकात कमी अधिक असा  लक्षणीय फरक पडत असल्याने मोठया प्रमाणात अनेक गुंतवणूकदार त्यांच्याकडे आकर्षित होतात .या कंपन्यांचे भाव तेजी असल्यास हळु हळु वाढातात तर मंदी आल्यास झटकन कमी होवू शकतात . त्याचप्रमाणे बिजनेस मॉडेल बदलणे ,व्यवस्थापन मंडळ बदलणे , नादारी ई अनेक कारणांनी त्यात फरक पडून भाव मोठ्या प्रमाणात कमी जास्त होवू शकतात .आज ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या याआधी मिड कॅप /स्मॉल कॅप होत्या .त्यामूळे आपण कोणत्या प्रकारचे  गुंतवणूकदार असून कीती जोखिम स्वीकारू शकतो  त्याचा , आपला बाजारविषयक अंदाज कीती प्रमाणात अचूक घेवू शकतो याचा विचार करून मगच यामधे  गुंतवणूक करावी . सर्व गुंतवणूक एकाच प्रकारच्या कंपन्यांच्यामधे न करता ती विविध ठिकाणी  विभागून करावी .जर आपण जास्त जोखिम घेवु शकत असलो तर मिडकॅप / स्मॉलकॅप कंपन्यांतील गुंतवणुक वाढवावी.बरेच वर्ष पूर्ण बहुमतातील सरकार नसल्याने 2014 मधील सार्वजनिक निवडणुकानंतर स्थिर सरकार आल्याने झालेल्या सकारात्मक भावनेने मिड कॅप /स्मॉल कॅपचे भावात अल्प कालावधीत 2/3 पट वाढ झाली .त्यानी चार महिन्यांचे कालावधीत 100 ते 300% हून अधिक रिटर्न दिला .तेव्हा अशा वेळी आलेल्या संधीचा लाभ करून घेण्याची वेळ साधणे हे ही गुंतवणूकदारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे .
    याशिवाय मुंबई शेअरबाजाराने बाजारमूल्य व दैनंदिन उलाढाल यांचा विचार करून तेथे नोंदवण्यात आलेल्या कंपन्याची 'A ' , ' B ' आणि ' Z ' या तीन गटात विभागणी केली आहे .पहिल्या दोनशे कंपन्या  ' A ' या गटात असून , बाजाराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्या ' Z ' गटात टाकल्या आहेत . उर्वरित सर्व कंपन्या ' B ' गटात आहेत . गुंतवणूक या दृष्टीने 'Z ' गटातील कंपन्यांचा अजिबात विचार करु नये .
   मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांनी ' T ' या नावाचा एक गट बनवला असून यामधील व्यवहार हे डिलिव्हरी घेवूनच करावे लागतात .त्याचे शॉर्ट सेलिंग करता येत नाही .खरेदी केलेले शेअर  आपल्या डी मॅट खात्यात आल्याशिवाय विकता येत नाहीत .' Z '  गटातील कंपन्यांचे व्यवहार सक्तीने ट्रेड टू ट्रेड पद्धतीनेच होतात .याशिवाय BSC , NSC आणि सेबी आपापसात चर्चा करून कोणत्याही कंपनीचा सामावेश या गटात करु शकतात अथवा या गटातून बाहेर आणू शकतात . या गटात असलेली कंपनी मग ती यापूर्वी कोणत्याही गटात असली तरी त्याचे व्यवहार हे ट्रेड टू ट्रेड या पद्धतीनेच करावे लागतात . सामान्य गुंतवणूकदाराच्या सुरक्षिततेसाठी ही योजना करण्यात आली आहे .

©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !

https://udaypingales.blogspot.in/?m=1

https://www.facebook.com/pingaleuday/.

हा लेख व यापूर्वीचे लेखन वरील लिंकवर उपलब्ध आहे .

No comments:

Post a Comment