मुंबई शेअरबाजार (Bombay Stock Exchange)
मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार असून तो जगभरात BSE या नावाने प्रसिद्ध आहे .9 जुलै 1875 साली याची स्थापना झाली म्हणजेच 142 वर्ष जुना असाहा समभाग बाजार आहे.प्रेमचंद रॉयचंद या 19 व्या शतकातील उद्योजकांने प्रथम कपडाउद्योग नंतर सोनेउद्योगात नाव कमवून या बाजाराचे महत्व जाणले आणि नेटिव्ह शेअर अँड शेअर ब्रोकर असोसियेशन ही संस्था स्थापन केली जी पुढे मुंबई शेअर बाजार म्हणून नावारूपास आली .या पूर्वी सध्याच्या टाउन हॉल समोरील वडाच्या झाडाखाली 22 दलालांनी आशा प्रकारची व्यवस्था असण्याची गरज यासंबंधी विचार केला होता .यावर अनेक चर्चा विचार विनिमय होऊन नियम आणि आचारसंहिता यास अंतिम रूप देण्यात आले .1874 चे आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होवून सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतरच ही संस्था 1875 ला अस्तित्वात येवून व्यवहार सुरू झाले . 1875 ते 1957 या कालावधीत येथे होणारे सर्व व्यवहार फक्त एकमेकांवरील विश्वासावर होत होते .यावेळी अस्तित्वात असलेले नियम आणि संकेत हे पुढे स्थापना झालेल्या 23 समभाग बाजारानी जसेच्या तसे स्वीकारले . 31 ऑगस्ट 1957 रोजी भारत सरकारने या बाजारास सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ऍक्ट 1956 अन्वये मान्यता दिली .अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला .
लोकांनी रुचि दाखवल्याने , बाजारातील उलाढाल प्रत्यक्ष कागदपत्रांचे सहाय्याने होत असल्याने , उलाढाल वाढू लागल्याने देवघेवीसाठी जागा अपुरी पडू लागली त्यामुळे 1980 मध्ये सध्याच्या फिरोज जिजिभोय टॉवर मधून व्यवहारास सुरुवात झाली .1986 मधे बाजाराची दिशा दर्शविणारा BSE Sensex या निर्देशांकाची (lndex) निर्मिती करण्यात आली .बाजारातील महत्वाच्या 30 समभागांच्या बाजारभावाशी Sensex निगडीत आहे आणि त्यास जागतिक मान्यता आहे .या मधील काळात झालेल्या आर्थिक सुधारणा , उघडकीस आलेले आर्थिक गैरव्यवहार ,त्यामुळे सक्षम यंत्रणा निर्माण होण्याची झालेली गरज , सरकारी दडपण ,उपलब्ध पर्यायी व्यवस्था ,त्याचप्रमाणे परिस्थितीच्या रेट्यामुळे स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वेळोवेळी काळानुरुप करावे लागलेले बदल यांचा एकत्रित परिणाम म्हणजे समभाग ,रोखे याशिवाय म्यूचुअल फंड ,ई टी एफ ,इडेक्स , गोल्ड बॉन्ड यांची खरेदी विक्री व्यतिरिक्त लहान कंपन्यांना sme चे माध्यमातून व्यवहार परवानगी , पुर्वीची बदला पद्दत रद्द करून वायद्याचे फ्यूचर ऑप्शन ,व्याजदर अदलाबदल ,भविष्यातील दर यांचे व्यवहार येथे सुरू झाले असून त्यात वेळोवेळी नवनवीन कल्पक व्यवहारांची भर पडत आहे .एक खाजगी संस्था ते व्यावसायिक कंपनी असे त्याचे परिवर्तन झाले आहे .येथील सर्व व्यवस्थापन व्यवसायिक संकेताचे पालन करून केले जाते .गुंतवणुकदाराना व्यवहार जगाच्या कानाकोपऱ्यातून संगणकाचे माध्यमातून करता येत आहेत 6 मायक्रोसेकंद इतक्या कमी वेळात ते पूर्ण होतात ,ही जागतिक बाजारातील सर्वात जलद अशी विक्रमी वेळ आहे . निक्षेपिकेमुळे (dipostary) सर्व कागदी प्रमाणपत्र नाहीशी होवून मालकी हस्तांतरण सुलभ आणि जलद झाले आहे .cdsl या bse च्या उपकंपनीद्वारे डिपोसिटरी सेवा पुरवण्यात येते . कागदी प्रणालीतून कागद विरहित पद्दतीत टप्याटप्याने कोणताही गोंधळ न होता 50 दिवसात हे बदल bse मधे करण्यात आले .बँकिंग प्रणालीतील बदलामुळे पैशांची देवाण घेवाण त्वरित होवू शकते . यामुळे बाजारातील दैनिक उलाढाल प्रचंड वाढली आहे . नोंदणीकृत कंपन्यांचे बाबतीत हा बाजार प्रथम स्थानावर तर दैनंदिन उलाढालीचे बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे .जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर आहे .सध्या रोज 2800हून अधिक कंपन्याचे 15 लाखांपेक्षा जास्त सौदे होत असून दैनिक उलाढाल 20000 कोटी पेक्षा जास्त आहे .BSE हा बाजार धोका व्यवस्थापन , समाशोधन , व्यवहारपूर्ती , बाजराशी संबधित आकडेवारी , गुंतवणुक साक्षरता याबाबत सरस असून या गोष्टी संबंधी जागतिक पातळीवर दखल घेण्यात येवून वेळोवेळी त्यास सन्मानित करण्यात आले आहे .
सध्याच्या शेअरबाजार संचालक मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारीसह एकूण 10 संचालक असून त्यातील 5 हे लोकांचे तर 4 भागधारकांचे प्रतिनिधीत्व करतात .अलीकडेच ऑफर फॉर सेल या माध्यमातून 2रुपये दर्शनी मूल्य असलेले समभाग 806 रुपयांनी विकून 3 फेब्रुवारी 2017 पासून भागबाजारात नोंदणी झालेला भारतातील पहिला आणि एकमेव भागबाजार आहे . इंडिया इंटरनेशनल एक्सचेंज India INS या भारतातील पहिल्या आंतरराट्रीय भागबाजारची स्थापना करून 9 जानेवारी 2017पासून सुरुवात करण्यात bse चे महत्वाचे योगदान आहे .यामुळे जागतिक गुंतवणूकदार ,अनिवासी भारतीय यांना त्यांच्या सोइप्रमाणे जगभरातून कुठूनही आठवड्यातील सहा दिवस रोज 22तासाचे कालावधीत गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली आहे .अश्या या वैशिठ्यपूर्ण बाजाराला त्याच्या 143 व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🎂🍫
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.
मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार असून तो जगभरात BSE या नावाने प्रसिद्ध आहे .9 जुलै 1875 साली याची स्थापना झाली म्हणजेच 142 वर्ष जुना असाहा समभाग बाजार आहे.प्रेमचंद रॉयचंद या 19 व्या शतकातील उद्योजकांने प्रथम कपडाउद्योग नंतर सोनेउद्योगात नाव कमवून या बाजाराचे महत्व जाणले आणि नेटिव्ह शेअर अँड शेअर ब्रोकर असोसियेशन ही संस्था स्थापन केली जी पुढे मुंबई शेअर बाजार म्हणून नावारूपास आली .या पूर्वी सध्याच्या टाउन हॉल समोरील वडाच्या झाडाखाली 22 दलालांनी आशा प्रकारची व्यवस्था असण्याची गरज यासंबंधी विचार केला होता .यावर अनेक चर्चा विचार विनिमय होऊन नियम आणि आचारसंहिता यास अंतिम रूप देण्यात आले .1874 चे आसपास वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होवून सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले आणि त्यानंतरच ही संस्था 1875 ला अस्तित्वात येवून व्यवहार सुरू झाले . 1875 ते 1957 या कालावधीत येथे होणारे सर्व व्यवहार फक्त एकमेकांवरील विश्वासावर होत होते .यावेळी अस्तित्वात असलेले नियम आणि संकेत हे पुढे स्थापना झालेल्या 23 समभाग बाजारानी जसेच्या तसे स्वीकारले . 31 ऑगस्ट 1957 रोजी भारत सरकारने या बाजारास सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ऍक्ट 1956 अन्वये मान्यता दिली .अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला .
लोकांनी रुचि दाखवल्याने , बाजारातील उलाढाल प्रत्यक्ष कागदपत्रांचे सहाय्याने होत असल्याने , उलाढाल वाढू लागल्याने देवघेवीसाठी जागा अपुरी पडू लागली त्यामुळे 1980 मध्ये सध्याच्या फिरोज जिजिभोय टॉवर मधून व्यवहारास सुरुवात झाली .1986 मधे बाजाराची दिशा दर्शविणारा BSE Sensex या निर्देशांकाची (lndex) निर्मिती करण्यात आली .बाजारातील महत्वाच्या 30 समभागांच्या बाजारभावाशी Sensex निगडीत आहे आणि त्यास जागतिक मान्यता आहे .या मधील काळात झालेल्या आर्थिक सुधारणा , उघडकीस आलेले आर्थिक गैरव्यवहार ,त्यामुळे सक्षम यंत्रणा निर्माण होण्याची झालेली गरज , सरकारी दडपण ,उपलब्ध पर्यायी व्यवस्था ,त्याचप्रमाणे परिस्थितीच्या रेट्यामुळे स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी वेळोवेळी काळानुरुप करावे लागलेले बदल यांचा एकत्रित परिणाम म्हणजे समभाग ,रोखे याशिवाय म्यूचुअल फंड ,ई टी एफ ,इडेक्स , गोल्ड बॉन्ड यांची खरेदी विक्री व्यतिरिक्त लहान कंपन्यांना sme चे माध्यमातून व्यवहार परवानगी , पुर्वीची बदला पद्दत रद्द करून वायद्याचे फ्यूचर ऑप्शन ,व्याजदर अदलाबदल ,भविष्यातील दर यांचे व्यवहार येथे सुरू झाले असून त्यात वेळोवेळी नवनवीन कल्पक व्यवहारांची भर पडत आहे .एक खाजगी संस्था ते व्यावसायिक कंपनी असे त्याचे परिवर्तन झाले आहे .येथील सर्व व्यवस्थापन व्यवसायिक संकेताचे पालन करून केले जाते .गुंतवणुकदाराना व्यवहार जगाच्या कानाकोपऱ्यातून संगणकाचे माध्यमातून करता येत आहेत 6 मायक्रोसेकंद इतक्या कमी वेळात ते पूर्ण होतात ,ही जागतिक बाजारातील सर्वात जलद अशी विक्रमी वेळ आहे . निक्षेपिकेमुळे (dipostary) सर्व कागदी प्रमाणपत्र नाहीशी होवून मालकी हस्तांतरण सुलभ आणि जलद झाले आहे .cdsl या bse च्या उपकंपनीद्वारे डिपोसिटरी सेवा पुरवण्यात येते . कागदी प्रणालीतून कागद विरहित पद्दतीत टप्याटप्याने कोणताही गोंधळ न होता 50 दिवसात हे बदल bse मधे करण्यात आले .बँकिंग प्रणालीतील बदलामुळे पैशांची देवाण घेवाण त्वरित होवू शकते . यामुळे बाजारातील दैनिक उलाढाल प्रचंड वाढली आहे . नोंदणीकृत कंपन्यांचे बाबतीत हा बाजार प्रथम स्थानावर तर दैनंदिन उलाढालीचे बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे .जागतिक क्रमवारीत तेराव्या स्थानावर आहे .सध्या रोज 2800हून अधिक कंपन्याचे 15 लाखांपेक्षा जास्त सौदे होत असून दैनिक उलाढाल 20000 कोटी पेक्षा जास्त आहे .BSE हा बाजार धोका व्यवस्थापन , समाशोधन , व्यवहारपूर्ती , बाजराशी संबधित आकडेवारी , गुंतवणुक साक्षरता याबाबत सरस असून या गोष्टी संबंधी जागतिक पातळीवर दखल घेण्यात येवून वेळोवेळी त्यास सन्मानित करण्यात आले आहे .
सध्याच्या शेअरबाजार संचालक मंडळात मुख्य कार्यकारी अधिकारीसह एकूण 10 संचालक असून त्यातील 5 हे लोकांचे तर 4 भागधारकांचे प्रतिनिधीत्व करतात .अलीकडेच ऑफर फॉर सेल या माध्यमातून 2रुपये दर्शनी मूल्य असलेले समभाग 806 रुपयांनी विकून 3 फेब्रुवारी 2017 पासून भागबाजारात नोंदणी झालेला भारतातील पहिला आणि एकमेव भागबाजार आहे . इंडिया इंटरनेशनल एक्सचेंज India INS या भारतातील पहिल्या आंतरराट्रीय भागबाजारची स्थापना करून 9 जानेवारी 2017पासून सुरुवात करण्यात bse चे महत्वाचे योगदान आहे .यामुळे जागतिक गुंतवणूकदार ,अनिवासी भारतीय यांना त्यांच्या सोइप्रमाणे जगभरातून कुठूनही आठवड्यातील सहा दिवस रोज 22तासाचे कालावधीत गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध झाली आहे .अश्या या वैशिठ्यपूर्ण बाजाराला त्याच्या 143 व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !💐🎂🍫
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी शेअर करा म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.
No comments:
Post a Comment