_ बँकेतर वित्तीय कंपन्या _ (Non Banking Finance Company)
बँकेतर वित्तीय कंपन्या म्हणजेच एन बी एफ सी या त्यांच्या नावाप्रमाणे बँका नसून बँक व्यवहारांच्या जवळपास कार्य करणाऱ्या संस्था आहेत यांची स्थापना 1956च्या कंपनी कायद्यानुसार झालेली असून कर्ज आणि उचल देण्याचे कार्य त्या व्यक्ति ,उद्योग याना करतात त्यामुळे कृषी , उद्योग आणि सेवा या क्षेत्राची अल्प , मध्यम आणि दीर्घ प्रमाणातील भांडवलाची गरज भागते तसेच व्यक्तींची तातडीची निकडही त्या पूर्ण करतात त्यांच्या विविध योजनामुळे बचत आणि गुंतवणुक यांचे विविध पर्याय उपलब्ध होतात .या गरजा येथील बँकिंग व्यवस्था पूर्ण करू शकत नाही . धाडसी निर्णय घेवून एन बी एफ सी या बँकिंगला पूरक असा व्यवहार करतात .या कंपन्या विक्रीयोग्य शेअर ,बॉन्ड , कर्जरोखे , सरकारी रोखे नाणेबाजार व भांडवल बाजारातील साधनांची खरेदी , विक्री , निर्मिती करतात त्याचप्रमाणे काही उत्पादक वस्तू भाड्याने देणे (leasing),उधारीने खरेदी करणे (hire purchase), विक्री करून येणाऱ्या उधारीचे बदल्यात योग्य ती फी आकारुन त्वरित पैशांची व्यवस्था करणे (factring),चीट या भीशी सारख्या साधनातून कृषी,उद्योग सेवा क्षेत्र याना मदत करीत असतात त्याचसोबत इतर अनेक उत्पन्न देणारे व्यवसाय करीत असतात.असे असले तरी त्यांचा व्यवसायाचा 50% पेक्षा अधिक वाटा हा वित्तव्यवसायाशी संबधित असतो .
कोणतीही कंपनी बँकेतर वित्तीय संस्था म्हणून भारतीय रिझर्व बँक याचेकडे नोंदणी केल्याशिवाय काम करू शकत नाही .यामधुन विमा कंपन्या ,निवृत्तीवेतन योजना आखणाऱ्या ,स्टॉक एक्सचेंज , दलालीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ,म्यूचुयल फंड पुरस्कृत करणाऱ्या कंपन्या विशेष वित्त संस्था यांचा अपवाद केला आहे . नोंदणी करण्यासाठी या कंपनीकडे किमान दोन कोटी रुपये एवढी मालमत्ता असावी लागते .तारण मालमत्ता व्यवसाय करणाऱ्या कंपन्याची मालमत्ता 100 कोटी असावी लागते . ज्या कंपन्याची मालमत्ता 500 कोटी असते अशा मोठ्या बँकेतर वित्तीय संस्थानी देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावला आहे. बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था यातील मुख्य फरक म्हणजे या संस्था मागणी देय ठेवी स्वीकारू शकत नाहीत .समशोधन व्यवस्थेत त्यांचा सहभाग नसतो . त्यांच्याकडील ठेवींना विमा संरक्षण नसते त्यामुळे तेथील ठेवी पूर्णपणे असुरक्षित असतात.ठेवी गोळा करण्यापूर्वी कोणत्याही एका मूल्यांकन करणाऱ्या कंपनीकडून (reating agency)सुरक्षेसंबधीत मूल्यांकन करून घ्यावे लागते जर या कंपन्यानी त्यांची गणना धोकादायक अशी केल्यास त्यांना ठेवी स्वीकारता येत नाहीत .
या कंपन्यांचे मालमत्ता , व्यवसायाचे स्वरूप ,ठेवी घेणे अथवा अजिबात न घेणे ,फक्त कर्ज किंवा उचल देणे ,पायाभूत सुविधासाठी कर्ज पुरवठा करणे ,विविध प्रकारात गुंतवणूक करणे ,तारण सुविधा देणे ,गृहउद्योग छोटे उद्योग याना कर्ज पुरवठा करणे ,बँकिंग परवाना मिळवण्याचा प्रयत्न करणे या उद्देशांवरून उपप्रकार पडतात आणि रिजर्व बँकेचे मार्गदर्शक तत्वांचे त्यांना पालन करावे लागते .या सर्व कंपन्याची यादी भारतीय रिजर्व बँकेचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे .या कंपन्या मर्यादित स्वरूपात ठेवी स्वीकारणे,कर्ज देणे ,भांडवल पुरवठा करणे ,गुंतवणुक नियोजन करणे यांसारखी कामे करीत आहेत. अनेक व्यक्ति आणि संस्था त्यांचा लाभ घेत असून त्यांच्याकडून कररूपाने सरकारला महसूल मिळत आहे . डिसेंबर 2016 चे उपलब्ध कामगीरीनुसार चढत्या क्रमाने उत्तम अश्या 10 बँकेतर वित्तीय कंपन्या खालील प्रमाणे --
10)Reliance capital
9)L& T finance
8)Mahindra &mahindra finance
7)Sundaram finance
6)Shriram finance
5)LIC housing finance
4)Indiabulls housing
3)Power finance corporation
2)Bajaj finserv
1)HDFC
या कंपन्यांच्या संदर्भात कोणतीही तक्रार उद्भवल्यास त्यांचे नियामक आणि कंपनी लॉ बोर्ड यांचेकडे तसेच ग्राहक न्यायालयात दाद मागता येते .
(सदर लेख एन बी एफ सी म्हणजेच बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे काय ?याची सर्वसाधारण माहिती मिळावी म्हणून लिहिला असून यात उल्लेख केलेल्या कंपन्याची कामगिरीचे अधिकृत मूल्यमापन त्यांचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे ,यामधील गुंतवणूक ही जोखमीची असल्याने आपल्या जबाबदारीने अथवा सल्लागाराचे मदतीने करावी)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा अथवा कमेन्टमधे त्यांचे नाव टाका म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.
बँकेतर वित्तीय कंपन्या म्हणजेच एन बी एफ सी या त्यांच्या नावाप्रमाणे बँका नसून बँक व्यवहारांच्या जवळपास कार्य करणाऱ्या संस्था आहेत यांची स्थापना 1956च्या कंपनी कायद्यानुसार झालेली असून कर्ज आणि उचल देण्याचे कार्य त्या व्यक्ति ,उद्योग याना करतात त्यामुळे कृषी , उद्योग आणि सेवा या क्षेत्राची अल्प , मध्यम आणि दीर्घ प्रमाणातील भांडवलाची गरज भागते तसेच व्यक्तींची तातडीची निकडही त्या पूर्ण करतात त्यांच्या विविध योजनामुळे बचत आणि गुंतवणुक यांचे विविध पर्याय उपलब्ध होतात .या गरजा येथील बँकिंग व्यवस्था पूर्ण करू शकत नाही . धाडसी निर्णय घेवून एन बी एफ सी या बँकिंगला पूरक असा व्यवहार करतात .या कंपन्या विक्रीयोग्य शेअर ,बॉन्ड , कर्जरोखे , सरकारी रोखे नाणेबाजार व भांडवल बाजारातील साधनांची खरेदी , विक्री , निर्मिती करतात त्याचप्रमाणे काही उत्पादक वस्तू भाड्याने देणे (leasing),उधारीने खरेदी करणे (hire purchase), विक्री करून येणाऱ्या उधारीचे बदल्यात योग्य ती फी आकारुन त्वरित पैशांची व्यवस्था करणे (factring),चीट या भीशी सारख्या साधनातून कृषी,उद्योग सेवा क्षेत्र याना मदत करीत असतात त्याचसोबत इतर अनेक उत्पन्न देणारे व्यवसाय करीत असतात.असे असले तरी त्यांचा व्यवसायाचा 50% पेक्षा अधिक वाटा हा वित्तव्यवसायाशी संबधित असतो .
कोणतीही कंपनी बँकेतर वित्तीय संस्था म्हणून भारतीय रिझर्व बँक याचेकडे नोंदणी केल्याशिवाय काम करू शकत नाही .यामधुन विमा कंपन्या ,निवृत्तीवेतन योजना आखणाऱ्या ,स्टॉक एक्सचेंज , दलालीचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ,म्यूचुयल फंड पुरस्कृत करणाऱ्या कंपन्या विशेष वित्त संस्था यांचा अपवाद केला आहे . नोंदणी करण्यासाठी या कंपनीकडे किमान दोन कोटी रुपये एवढी मालमत्ता असावी लागते .तारण मालमत्ता व्यवसाय करणाऱ्या कंपन्याची मालमत्ता 100 कोटी असावी लागते . ज्या कंपन्याची मालमत्ता 500 कोटी असते अशा मोठ्या बँकेतर वित्तीय संस्थानी देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावला आहे. बँका आणि बँकेतर वित्तीय संस्था यातील मुख्य फरक म्हणजे या संस्था मागणी देय ठेवी स्वीकारू शकत नाहीत .समशोधन व्यवस्थेत त्यांचा सहभाग नसतो . त्यांच्याकडील ठेवींना विमा संरक्षण नसते त्यामुळे तेथील ठेवी पूर्णपणे असुरक्षित असतात.ठेवी गोळा करण्यापूर्वी कोणत्याही एका मूल्यांकन करणाऱ्या कंपनीकडून (reating agency)सुरक्षेसंबधीत मूल्यांकन करून घ्यावे लागते जर या कंपन्यानी त्यांची गणना धोकादायक अशी केल्यास त्यांना ठेवी स्वीकारता येत नाहीत .
या कंपन्यांचे मालमत्ता , व्यवसायाचे स्वरूप ,ठेवी घेणे अथवा अजिबात न घेणे ,फक्त कर्ज किंवा उचल देणे ,पायाभूत सुविधासाठी कर्ज पुरवठा करणे ,विविध प्रकारात गुंतवणूक करणे ,तारण सुविधा देणे ,गृहउद्योग छोटे उद्योग याना कर्ज पुरवठा करणे ,बँकिंग परवाना मिळवण्याचा प्रयत्न करणे या उद्देशांवरून उपप्रकार पडतात आणि रिजर्व बँकेचे मार्गदर्शक तत्वांचे त्यांना पालन करावे लागते .या सर्व कंपन्याची यादी भारतीय रिजर्व बँकेचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे .या कंपन्या मर्यादित स्वरूपात ठेवी स्वीकारणे,कर्ज देणे ,भांडवल पुरवठा करणे ,गुंतवणुक नियोजन करणे यांसारखी कामे करीत आहेत. अनेक व्यक्ति आणि संस्था त्यांचा लाभ घेत असून त्यांच्याकडून कररूपाने सरकारला महसूल मिळत आहे . डिसेंबर 2016 चे उपलब्ध कामगीरीनुसार चढत्या क्रमाने उत्तम अश्या 10 बँकेतर वित्तीय कंपन्या खालील प्रमाणे --
10)Reliance capital
9)L& T finance
8)Mahindra &mahindra finance
7)Sundaram finance
6)Shriram finance
5)LIC housing finance
4)Indiabulls housing
3)Power finance corporation
2)Bajaj finserv
1)HDFC
या कंपन्यांच्या संदर्भात कोणतीही तक्रार उद्भवल्यास त्यांचे नियामक आणि कंपनी लॉ बोर्ड यांचेकडे तसेच ग्राहक न्यायालयात दाद मागता येते .
(सदर लेख एन बी एफ सी म्हणजेच बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे काय ?याची सर्वसाधारण माहिती मिळावी म्हणून लिहिला असून यात उल्लेख केलेल्या कंपन्याची कामगिरीचे अधिकृत मूल्यमापन त्यांचे संकेतस्थळावर उपलब्ध आहे ,यामधील गुंतवणूक ही जोखमीची असल्याने आपल्या जबाबदारीने अथवा सल्लागाराचे मदतीने करावी)
©उदय पिंगळे
ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वरील लेख श्रेयनामासह प्रसारित करण्याची परवानगी आहे !
https://udaypingales.blogspot.in/?m=1
https://www.facebook.com/pingaleuday/.
आपल्या मित्रांनी ही माहिती वाचण्यासाठी आपण त्या॑ना tag करा अथवा कमेन्टमधे त्यांचे नाव टाका म्हणजे अनेकांपर्यत ही माहिती एकाच वेळी पोहोचेल.